Maharashtra Weather Update : कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट, राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे. विदर्भामध्ये उष्णतेचा दाह वाढलेला असताना काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



 वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी


हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' (Yellow Alert)जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो. यामध्ये कोल्हापूर, सांगली ,सोलापूर, लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.



विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट


कोल्हापूर, सांगली ,सोलापूर, लातूर धाराशिव या पाचही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे.



 'याठिकाणी' उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'


राज्यात एका बाजूला पावसाचे वातावरण तयार होत असताना, विदर्भाची मात्र सध्या भट्टी झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. गुरुवारी (21 मे) विदर्भात तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली असून, हवामान विभागाने शुक्रवार (22 मे) आणि शनिवार (23 मे) अशा दोन्ही दिवशी विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट' ('Red alert') जारी केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे राज्यावर उष्णतेची लाट आणि आता पावसाचे इशारा असे दुहेरी संकट राज्यावर निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

BMC Makes 4-Way Waste Segregation : मुंबईत कचराकोंडीवर बीएमसीचा 'मास्टरस्ट्रोक': मोठ्या सोसायट्या, हॉटेल्ससाठी '४-स्तरीय' कचरा वर्गीकरण सक्तीचे!

मुंबई : मुंबई शहराला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या अक्राळविक्राळ समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत

Mumbai Accident : वर्सोवा-जुहू लिंक रोडवर भीषण अपघात; भरधाव बसने अनेक गाड्यांना दिली धडक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख