Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे. विदर्भामध्ये उष्णतेचा दाह वाढलेला असताना काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Viral 'Melody' moment : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आडनावांना एकत्र करून नेटकऱ्यांनी तयार केलेला ‘मेलोडी’ हॅशटॅग ...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' (Yellow Alert)जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो. यामध्ये कोल्हापूर, सांगली ,सोलापूर, लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई : मुंबई शहराला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या अक्राळविक्राळ समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता ...
विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट
कोल्हापूर, सांगली ,सोलापूर, लातूर धाराशिव या पाचही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे.
मंत्री छगन भुजबळ; मे महिन्यात नेहमीपेक्षा २० टक्के अधिक इंधन विक्री मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या ...
'याठिकाणी' उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'
राज्यात एका बाजूला पावसाचे वातावरण तयार होत असताना, विदर्भाची मात्र सध्या भट्टी झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. गुरुवारी (21 मे) विदर्भात तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली असून, हवामान विभागाने शुक्रवार (22 मे) आणि शनिवार (23 मे) अशा दोन्ही दिवशी विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट' ('Red alert') जारी केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे राज्यावर उष्णतेची लाट आणि आता पावसाचे इशारा असे दुहेरी संकट राज्यावर निर्माण झाले आहे.