Reserve Bank Of India (RBI) : यशवंत सहकारी बँक बंद; खातेदारांना पैसे कसे मिळणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

फलटण : महाराष्ट्रातील फलटण येथील ‘यशवंत सहकारी बँक’चा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे, आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत होणे आणि भविष्यात उत्पन्न वाढण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे RBI ने ही मोठी कारवाई केली. १९ मे १०१६ रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्यात येणार आहेत.


RBI ने महाराष्ट्र सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंतीही केली आहे. बँकेने बँकिंग नियमन कायद्यातील अनेक आवश्यक नियमांचे पालन केले नसल्याचे RBI च्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याची क्षमता उरलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बँक सुरू ठेवणे हे ठेवीदारांच्या हिताविरोधात ठरू शकते, असे RBI ने म्हटले.



दरम्यान, या निर्णयामुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली असली तरी बहुतांश ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ९९.०२ टक्के ठेवीदारांच्या ठेवी ५ लाख रुपयांच्या आत आहेत. त्यामुळे या खातेदारांना त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम परत मिळू शकते.


बँक लिक्विडेशन प्रक्रियेत गेल्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD) अशा सर्व खात्यांतील एकूण रक्कम एकत्रित धरून हे विमा संरक्षण लागू होते. म्हणजेच एका व्यक्तीच्या एका बँकेतील सर्व खात्यांचा एकत्र विचार केला जातो. प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र ५ लाखांचे संरक्षण मिळत नाही.



DICGC ने २० एप्रिल २०२६ पर्यंत बँकेच्या ठेवीदारांना तब्बल १०६.९६ कोटी रुपयांची रक्कम आधीच वितरित केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश खातेदारांना त्यांचे पैसे मिळण्याची प्रक्रिया सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे मानले जात आहे.


मात्र ज्यांच्या ठेवी ५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत, त्यांना उर्वरित रक्कम बँकेच्या मालमत्तेची विक्री आणि लिक्विडेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळू शकते. परंतु ही प्रक्रिया किती काळ चालेल आणि किती रक्कम परत मिळेल याबाबत निश्चितता नसते.


DICGC ही RBI ची उपकंपनी असून भारतातील सर्व व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांमधील ठेवींना विमा संरक्षण देते. १ फेब्रुवारी २०२० पासून ठेवींवरील विमा मर्यादा १ लाखांवरून वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली होती.


दरम्यान, खातेदारांनी सध्या काही महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. बँकेचे पासबुक, FD प्रमाणपत्रे, खाते कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती सुरक्षित ठेवावी. लिक्विडेटर नियुक्त झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधावा. तसेच DICGC आणि RBI च्या अधिकृत वेबसाइटवरून सातत्याने अद्ययावत माहिती तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


फलटणच्या यशवंत सहकारी बँकेतील बहुतांश खातेदारांच्या ठेवी ५ लाखांच्या मर्यादेत असल्याने त्यांना संपूर्ण रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मोठ्या ठेवी असलेल्या खातेदारांना त्यांच्या पैशांसाठी लिक्विडेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

Comments
Add Comment

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे

Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात

Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी स्वच्छतेचा मेगा प्लॅन! 56 हजार तात्पुरती स्वच्छतागृहे, 8 हजार सफाई कर्मचारी 24 तास सेवेत

Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela : पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने स्वच्छतेचा

Pratap Sarnaik : 'एसटी'च्या तीर्थाटन योजनेत खासगी भागीदारीला हिरवा कंदील

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजनेला वेग; राज्यभर सहा प्रादेशिक पर्यटन संस्थांची

Petrol-Diesel Prices From Nayara Energy : महिन्याच्या सुरुवातीलाच मोठी आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त! नायरा एनर्जीचा मोठा दिलासा

नवी दिल्ली : देशातील वाहनचालकांना अखेर दिलासादायक बातमी मिळाली आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्याने

LPG Cylinder Price : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल; १ जुलैपासून लागू झाले 'हे' नवे नियम

नवी दिल्ली : आज, १ जुलै २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम