तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांना सूचना देणार
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही मित्रपक्षांचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. महायुतीची प्रतिमा मलीन होईल, युतीला डाग लागेल किंवा विरोधकांना टीका करण्याची संधी मिळेल, अशाप्रकारचे कोणतेही वादग्रस्त भाष्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी करू नये, असे मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले.
नॉर्वे : नॉर्डिक देशांसोबत नॉर्वे येथे झालेल्या शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी इटलीतील रोमच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. नॉर्वेत मोदींच्या ...
शालेय शिक्षण मंत्री मंत्री दादा भुसे यांच्या 'जंजिरा' शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, अतिशय खेळीमेळीच्या आणि सलोख्याच्या वातावरणात ही बैठक पार पडली. तिन्ही मित्रपक्षांचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे, याबाबत चर्चा झाली. महायुतीला डाग लागेल किंवा टीका होईल, अशाप्रकारचे भाष्य कोणत्याही पक्षाचे नेते वा कार्यकर्त्यांनी करायचे नाही, असे ठरवण्यात आले.
मालवणी मधल्या अनधिकृत बांधकामाने पीडित महिलेची मंत्री लोढा यांनी घेतली भेट बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी देशाच्या सुरक्षेला धोका, वरिष्ठ ...
या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावर या बैठकीत मुख्यत्वे खलबते झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या एकूण १६ जागांसाठीच्या संभाव्य फॉर्म्युल्यावर या बैठकीत प्रामुख्याने मंथन करण्यात आले. जागावाटपावरून तिन्ही पक्षांत कोणताही कटुता येऊ नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षनिहाय संख्याबळाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार; ४३ नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्राकडे जाणार मुंबई : नॉन क्रिमीलेअरची मर्यादा आठहून १५ ...
रखडलेल्या महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार?
विधान परिषदेसोबतच गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रखडलेल्या शासकीय महामंडळांच्या वाटपाचा तिढा सोडवण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. कोणती महामंडळे नेमकी कुणाच्या वाट्याला येणार आणि कार्यकर्त्यांना सत्तेत कसे वाटेकरी करून घ्यायचे, याविषयीचे फॉर्म्युला ठरवण्यासाठी नेत्यांनी सविस्तर चर्चा केली.




