सार्वजनिक रस्ते नागरिकांसाठी, धार्मिक कार्यांसाठी नव्हे
उत्तर प्रदेशातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण देताना योगींनी स्पष्ट केले की, सार्वजनिक रस्ते हे केवळ नागरिकांच्या वाहतुकीसाठीच राखीव आहेत. ते म्हणाले, "देशभरातून अनेक जण मला आश्चर्याने विचारतात की, उत्तर प्रदेशमध्ये खरोखरच रस्त्यावर नमाज पठण बंद झाले आहे का? यावर माझे ठाम उत्तर असते की, होय, आमच्या राज्यात रस्त्यांवर नमाज अदा करण्याची अजिबात परवानगी नाही. कुणालाही शंका असेल तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन खात्री करावी." रस्ते अडवून सर्वसामान्य जनतेची, रुग्णवाहिकांची आणि अत्यावश्यक सेवांची कोंडी करण्याचा अधिकार कोणत्याही गटाला किंवा समुदायाला नाही. ज्या धार्मिक विधींसाठी जी प्रार्थनास्थळे निश्चित केली आहेत, तिथेच ते पार पडले पाहिजेत, यावर त्यांनी विशेष भर दिला.
जागेअभावी नियम मोडता येणार नाहीत
प्रार्थनास्थळांवरील जागेच्या अभावामुळे रस्त्यावर यावे लागते, या युक्तिवादावरही मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, "काही लोकांनी माझ्याकडे तक्रार केली की आमची लोकसंख्या जास्त असल्याने मशिदीत जागा पुरत नाही आणि नाइलाजाने रस्त्यावर नमाज पढावी लागते. यावर मी त्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत सुचवले आहे की, जागा अपुरी असेल तर तुम्ही एकाच वेळी गर्दी न करता वेगवेगळ्या 'शिफ्ट्स' (टप्प्यांमध्ये) नमाज अदा करू शकता. जर तुमच्याकडे मोठी जागा नसेल, तर गर्दीवर नियंत्रण ठेवणे ही सर्वस्वी तुमचीच जबाबदारी आहे. तुम्हाला जर समाजाचा आणि इथल्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून राहायचे असेल, तर संविधानाने आखून दिलेल्या नियमांचे आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल."
मेक्सिको : मेक्सिकोमधील पुएब्ला राज्यात झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात (Mexico Puebla Shooting) किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या ...
हुल्लडबाजांना थेट इशारा आणि कायद्याचा धाक
आपल्या भाषणाचा समारोप करताना योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा 'कायदा सर्वांसाठी समान आहे' या तत्त्वाचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाचा नमाज पठणाला कोणताही विरोध नाही, मात्र त्याचा त्रास रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य नागरिकांना, रुग्णांना किंवा व्यापाऱ्यांना होता कामा नये. "कुणालाही रस्ते वेठीस धरू दिले जाणार नाहीत," असा इशारा देत त्यांनी हुल्लडबाजांना आणि कायदा हातात घेणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. "राज्यात कोणत्याही प्रकारची अराजकता खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाचे काम संवाद साधणे आहे आणि आम्ही तो प्रेमाने साधत आहोत. पण, जर कोणी सामंजस्याने ऐकणार नसेल, तर त्यांनी थेट कारवाईला आणि संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. नुकतेच बरेलीमध्ये काही उपद्रवी लोकांनी असा प्रयत्न करून पाहिला होता, पण त्यांना त्यांच्या कृत्याची योग्य ती शिक्षा मिळाली आहे," असा थेट दाखला देत उत्तर प्रदेशात गुंडगिरीला अजिबात थारा नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.