PM Modi IIT Delhi Convocation : "मी काय बाबा बागेश्वर नाही..."; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात PM मोदींचं मिश्कील वक्तव्य

नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली (IIT Delhi) च्या ५७ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावत पदवीधरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत विद्यार्थ्यांना संबोधित केले. "आज दीक्षांत समारंभाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार सुरू असतील. मी काय बाबा बागेश्वर नाही, पण तरीही तुमच्या मनात काय चाललंय याचा अंदाज लावू शकतो," असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पहिली नोकरी, पहिला पगार, स्वतःचा स्टार्टअप की स्पर्धा परीक्षा, अशा विविध स्वप्नांची चित्रे सध्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर तरळत असल्याचे त्यांनी नमूद केले.



तंत्रज्ञानामुळे जग अत्यंत वेगाने बदलत असून पुढील २० ते ३० वर्षांत जागतिक व्यवस्था कशी असेल याचा अचूक अंदाज बांधणे कठीण असल्याचे सांगत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत राहण्याचा (Continuous Learning) सल्ला दिला. बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी हीच एकमेव गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, यंदाच्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक आणि इतर पदके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच, पदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढायला हवी होती, अशी आपुलकीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





आपल्या भाषणात देशाच्या विकासातील युवा पिढीच्या भूमिकेवर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक पिढीचे एक राष्ट्रीय कर्तव्य असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला, तर आजच्या पिढीवर 'विकसित भारत' घडवण्याची मोठी जबाबदारी आहे. आगामी ३० ते ३५ वर्षांत विद्यार्थी जे काही काम करतील किंवा निर्णय घेतील, त्याचा थेट परिणाम देशाच्या प्रगतीवर होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्यातून देशाचा काय फायदा होईल, याचा विचार करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला.

Comments
Add Comment

Javelin Missile : भारत अमेरिकेकडून ‘जॅव्हेलिन’ क्षेपणास्त्र खरेदी करणार, शत्रूचे रणगाडे क्षणात नष्ट करणार

नवी दिल्ली : भारत आपली सुरक्षा यंत्रणा सातत्याने आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी भारताकडून

Flood situation in Nepal : पूरग्रस्त नेपाळसाठी भारताची ‘एअर रिलीफ’; वायुसेनेने पोहोचवली 47.5 टन मदत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये हिमनदीचा मोठा भाग तुटल्याने आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या हानीचा सामना

Citizens from Maharashtra stranded in Nepal : सागात अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

सागा : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले

New Delhi : नवी दिल्लीत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्याला अटक

मोहम्मद साहिल व समिराकडून केले जप्त 8 भारतीय सिमकार्ड नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले