Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली. लग्नाचा सोहळा आनंदात पार पडून घरी परतलेल्या आई-वडिलांची त्यांच्या स्वतःच्या मुलाने निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. विशेष म्हणजे, पत्नीसमोर आई-वडिलांनी अपमानास्पद शब्द वापरल्याचा राग मनात धरून मुलाने संतापाच्या भरात थेट जन्मदात्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. या दुहेरी हत्याकांडामुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटीमध्ये गुरुवारी (१५ मे २०२६) दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी रांजुदेवी महतो यांनी नुकतेच आपल्या मुलीचे लग्न मोठ्या आनंदात पार पाडले होते. लग्नाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण अजूनही घरात कायम असतानाच अचानक घरगुती कारणावरून त्यांचा मुलगा चंदन इंदाराम महतो याच्यासोबत वाद झाला.


वाद वाढत असताना आई-वडिलांनी पत्नीसमोर आपला अपमान केल्याची भावना चंदनच्या मनात निर्माण झाली. पत्नीसमोर अपमानास्पद शब्द ऐकावे लागल्याने तो संतापाने अनावर झाला. रागाच्या भरात त्याने घरात असलेले मुसळ उचलले आणि आई-वडिलांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने इंदाराम महतो आणि रांजुदेवी महतो यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला.



घटनेनंतर आरोपी चंदन महतो हा घरातून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, तो घाईघाईने घराबाहेर पडताना शेजाऱ्यांना संशय आला. नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला जागीच पकडून ठेवले आणि तातडीने शिरपूर पोलिसांना माहिती दिली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला फरार होण्यात यश आले नाही.


घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी चंदन महतो याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःच्या आई-वडिलांची इतक्या निर्दयीपणे हत्या केल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप किंवा दुःख दिसून येत नव्हते. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडाची नोंद केली असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

MPSC Nipun Setu : एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना 'निपुण सेतू'द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम

Devendra Fadnavis : नीट' परीक्षेच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) रद्द केलेली

Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. लहानपणापासून एकचं

Crime News : रात्री वडिलांनी चापट मारली, घरात सकाळी भयानक दृश्य समोर आलं, मॅकेनिकल इंजिनिअर मुलाचं वडिलांसोबत भयंकर कृत्य

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाला जास्त जीव लावला जातो, हा राग मनात

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोनवडी येथील

Transport Minister Pratap Sarnaik : एसटीची स्थानके आणि बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; जागतिक पर्यावरण दिनी राज्यव्यापी आधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मुंबई :