BMC ने मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांसाठी सुरू केली कूलिंग ट्रीटमेंट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांवर ताण वाढतो. परिणामी, झाडांची मुळे कमकुवत होऊन जमिनीवरील पकड सैल पडण्याची शक्यता वाढते. तसेच झाडांच्या फांद्या कोरड्या व ठिसूळ होऊन तुटण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून झाडांना नियमित पाणी देण्यावर विशेष भर देण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना महानगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या झाडांचे संवर्धन होण्यासाठी संपूर्ण उन्हाळ्यात या झाडांना पाणी शिंपडण्यासाठी पुढाकार का घ्यावासा वाटत नाही नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.



वाढत्या तापमानाचा मुंबईतील वृक्षसंपदेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये तसेच मुंबईकरांना गारवा मिळावा, या उद्देशाने महानगरपालिकेकडून झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. झाडांच्या मुळांना पुरेसे पाणी न मिळाल्यास ती कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन झाडांसाठी असे पाणी पुरवून संजीवनी देण्यासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. पिण्यासाठी अयोग्य असलेले, परंतु झाडांसाठी पोषक असलेले पाणी यासाठी वापरण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना महानगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर, खासगी क्षेत्रातील झाडांसाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांनी पाणीपुरवठा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.



महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रस्ते स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याच्या टँकरद्वारे झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जी दक्षिण विभागात केशवराव खाड्ये मार्ग तसेच सांताक्रुझ व जुहू परिसरात स्वच्छता अभियानासोबत झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. उद्यान विभागाकडूनही मुंबईतील विविध भागांत झाडांची निगा राखणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे तसेच झाडांच्या आरोग्याची पाहणी करणे, ही कामे सातत्याने सुरू आहेत. विशेष म्हणजे ज्या झाडांना पाणी घातले जात आहे, त्या झाडांच्या बुंध्याभोवती मातीचाच थर नसून मुळे उघडी पडू लागली आहे, तिथे केवळ पाणी शिंपण्याचे काम केले आहे. त्यामुळे माती अभावी हे झाड कधीही जमिन सोडून उन्मळून पडू शकते. त्यामुळे झाडाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतानाच ते ताठ मानेने उभे राहावे यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती माती टाकण्याचा प्रयत्न मात्र महापालिका प्रशासनाकडून केला जात नसल्याचे दिसून येत आहे.



वृक्षतज्ज्ञांच्या मते, झाडांना वेळेवर पाणी मिळाल्यास त्यांच्या अंतर्गत पाणी वहन प्रक्रियेस मदत होते व उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी होतो. त्यामुळे फांद्या सुकणे, ठिसूळ होणे किंवा झाडांची स्थिरता कमी होणे यांसारख्या समस्या काही प्रमाणात टाळता येतात. उन्हाळ्यात झाडांचे जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या परिसरातील तसेच गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडांना वेळोवेळी पाणी घालावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे

Devendra Fadnavis : ५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा

Chief Minister Devendra Fadnavis : 'बेस्ट'च्या पुनरुज्जीवनासाठी 'भाडेपट्टा मॉडेल'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; २२ डेपोंच्या १२३ एकर जागेचा समावेश, पीपीपी तत्त्वावर होणार विकास मुंबई : मुंबईची

Former President Dr.Kalam : माजी राष्ट्रपती डॉ. कलामांचे नाव पुसून आयटीआयला हाजी बाबांचे नाव द्या!

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रस्ताव फेटाळला मुंबई : भारताचे माजी

Aarey Colony : आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावणार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून