Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची ‘हिस्टोरिक व्हिक्टरी ’; हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल


गुवाहाटी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले. हिमंता बिस्व सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.


आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “आसामच्या जनतेने विकासावर विश्वास ठेवत भाजपला भरघोस समर्थन दिले. हिमंता बिस्व सरमा हे डायनामिक आणि व्हिजनरी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणाच्या योजनांनी मोठे यश मिळवले.”



‘अरुणोदय’ आणि ‘लाडकी बहिणी’सारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. “हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे,” असेही ते म्हणाले.


यावेळी शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’चा विचार देशासमोर ठेवला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी केला असून, देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.


तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचे कौतुक करत शिंदे म्हणाले, “अमित शाह यांची चाणक्यनीती पश्चिम बंगालप्रमाणेच आसाममध्येही यशस्वी ठरली. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले.”
भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत घेतली आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. हा विजय त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे.”



महाराष्ट्र आणि आसाममधील संबंधांचा उल्लेख करत त्यांनी जुनी आठवणही सांगितली. “चार वर्षांपूर्वी आम्ही याच रेडिसन हॉटेलमध्ये होतो. त्यावेळी आसाम सरकारने आम्हाला मोठी मदत केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले,” असे शिंदे म्हणाले.


“आई कामाख्या देवीचा आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहे. डबल इंजिन सरकारमुळे आसाममध्ये विकास, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विकास अधिक वेगाने होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप कायम; 'या' तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून २१ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; जुलैअखेर चांगल्या पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा

Ashadhi Wari 2026 : वारीत वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेयामुळे २ परिचारिकांना विषबाधा; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई

धाराशिव : धाराशिवमध्ये शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. भाविकांना

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरांचा धुमाकूळ! ६७ महिला, २२ पुरुषांसह ८९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी

FIFA World Cup 2026 : 'तू फुटबॉलसाठी योग्य नाहीस' म्हणत क्लबने केलं होतं रिजेक्ट; पण आज' हा' खेळाडू ठरला अर्जेंटिनाचा हिरो

FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाला (Argentina) सेमीफायनलचं (Semi-final) तिकीट मिळवून देण्यात लौतारो मार्टिनेज (Lautaro Martinez) याने निर्णायक भूमिका

Wimbledon 2026 : विम्बल्डन फायनलमध्ये सिनरचाच दबदबा; झ्वेरेव्हवर मात करत सलग दुसरं जेतेपद

Wimbledon 2026 : विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) पुरुष एकेरी (Men's Singles) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीच्या जानिक सिनर (Jannik Sinner) याने दमदार

Bangkok Bar Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; बारला आग लागून २७ जणांचा मृत्यू

बँकॉक  : थायलंडची राजधानी बँकॉक (Bangkok) येथे रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री एका बारमध्ये (Bar) भीषण आग (Fire) लागून २७ जणांचा