Prime Minister Narendra Modi : शेती आपली आई, तिला रसायनांपासून वाचवा'; जागतिक युद्धाच्या सावटात पंतप्रधानांचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा राष्ट्राला उद्देशून महत्त्वाचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, भारताची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः शेती, इंधन आणि खाद्यतेल या क्षेत्रांत 'बचत आणि बदल' करण्याचा मंत्र त्यांनी दिला आहे.



नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज: रासायनिक खतांपासून मुक्ती


"शेती ही आपली माता आहे आणि तिला रासायनिक खतांच्या विळख्यातून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे," अशा भावनिक शब्दांत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण सर्व शेतीपुत्र आहोत, त्यामुळे जमिनीचा कस टिकवण्यासाठी आता रासायनिक शेतीला पूर्णविराम देऊन नैसर्गिक शेतीचा (Natural Farming) मार्ग स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे केवळ जमिनीचे आरोग्य सुधारणार नाही, तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कमी होईल. पंतप्रधानांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या आर्थिक संकटातून जग सावरत असतानाच, आता पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीने नवीन संकट उभे केले आहे. या युद्धाचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर (Supply Chain) होत असून भारतालाही त्याचे चटके सोसावे लागत आहेत. "हे या दशकातील मोठे संकट आहे, पण आपण एकत्रितपणे यातून नक्कीच मार्ग काढू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



परकीय चलनाचा ओघ रोखण्यासाठी छोटे संकल्प


भारत कच्च्या तेलासाठी आणि खाद्यतेलासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन (Foreign Exchange) खर्च करतो. जागतिक संकटामुळे या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना 'छोटे संकल्प' करण्याचे आवाहन केले आहे. "जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत आपल्याला उपभोग कमी करून कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल," असे मोदी म्हणाले.



इंधन आणि खाद्यतेल बचतीसाठी 'लाईफस्टाईल'मध्ये बदल


पंतप्रधानांनी दैनंदिन जीवनात खालील बदल सुचवले आहेत. जिथे शक्य आहे तिथे खासगी वाहनांऐवजी मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य द्यावे, शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत आणि बैठका शक्यतो ऑनलाईन स्वरूपात कराव्यात, जेणेकरून इंधनाची बचत होईल. खाद्यतेलाच्या आयातीवर मोठा खर्च होतो, त्यामुळे त्याचा वापर मर्यादित केल्यास देशाच्या तिजोरीवरील ताण कमी होईल आणि आरोग्यालाही फायदा होईल.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन