मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जय पवार यांच्या 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात' या विधानावर भाष्य करताना त्यांना राजकीय वास्तवाचे भान राखण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. "प्रत्येकाच्या मनात अनेक इच्छा असतात, मात्र राजकीय वास्तव लक्षात घेऊनच आम्हाला पक्ष म्हणून वाटचाल करावी लागते," अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.
कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendhu Adhikari) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ (Chandranath Rath) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात पश्चिम ...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. "अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी बारामतीकरांची इच्छा होतीच, पण आता सुनेत्रा वहिनी त्यासाठी कष्ट घेत आहेत. २०२९ मध्ये त्या बारामतीतून निवडणूक लढवतील आणि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे," असे जय पवार म्हणाले होते.
जय पवारांच्या विधानावर पत्रकारांनी विचारले असता सुनील तटकरे म्हणाले, "एखादे नेतृत्व मोठे व्हावे असे कार्यकर्त्याला किंवा कुटुंबातील व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे. जय पवार यांनीही त्याच भावनेतून ते विधान केले असावे. मात्र, राजकारणात केवळ इच्छा असून चालत नाही, तर राजकीय वास्तव स्वीकारावे लागते. आमचा पक्ष एनडीएचा घटक आहे आणि आम्ही त्याच चौकटीत राहून पुढील वाटचाल करत आहोत", असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : क्रूड ऑइलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आज जागतिक बाजारपेठांमध्ये (Share Market) कमजोरीचे संकेत मिळत आहेत. मात्र, मागील सत्रात अमेरिकन बाजार मजबूत ...
रोहित पवारांचीही वादात उडी
दरम्यान, या वादात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. जय पवारांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जय पवारांना सल्ला देताना म्हणाले की, आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती. अजित दादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि रस्त्यावरची लढाई लढून 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी दादांची इच्छा होती. मात्र, आजच्या परिस्थितीत भाजपसोबत राहून दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. जर कुणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर भाजपला प्रखर विरोध करावाच लागेल. अजितदादांच्या गेल्या चार महिन्यांतील विधानांवरून ते भाजपला विरोध करत असल्याचेच दिसत होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी ठेवावी." असे रोहित पवार म्हणाले.




