Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा अक्षरशः 40 अंशाच्या पुढे गेल्याने अनेक जिल्हे होरपळले आहेत. अशातच आज राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलीय.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना संकटात सापडले. शिंदेंचे हेलिकॉप्टर ...
या जिल्ह्यांत पावसाची हजेरी
सातारा (Satara) - जिल्ह्यातील पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे, बोरगाव, नागठाणे, शहरातील उपनगरात पाऊस झाला आहे.. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची चांगलीच उडाली तारांबळ उडाली. आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे. (Maharashtra Rain Update )
सिंधुदुर्ग (Sindhudurg) - जिल्ह्यातील वैभववाडी, फोंडा, करुळ सह कणकवली, वैभववाडी तालुक्याच्या भागात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसासाठी यलो अलर्ट पावसाचा जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग आहे. (Maharashtra Rain Update )
रायगड (Raigad )- रायगडच्या दक्षिण भागातही मुसळधार अवकाळी पाऊस झाला. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात मुसळधार पावसाची बरसात सुरु आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणे आणि परिसराला झोडपून काढलं आहे. (Maharashtra Rain Update )
Nashik TCS Case : नाशिकमधील काही प्रकरणे राज्य पातळीवर मोठ्या चर्चेचे विषय आहेत, त्यापैकीच एक म्हणजे नाशिकचे टीसीएस प्रकरण. टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि ...
नांदेड (Nanded ) - नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं. आजच्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः या भागात उन्हाळी तीळ अन भुईमुंग पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, या दोन्ही पिकांसह हळदीला देखील या पावसाचा फटका बसलाय.आजच्या पावसाने माहूर सह शेजारच्या किनवट तालुक्यात दाणादाण उडवली आहे.
या अचानक आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. तर आज अनेक आयोजित लग्नसोहळ्याला या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल झाले. नांदेड मध्ये अचानक आलेल्या वावटळीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला. हवेत प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरल्यामुळे शहरात काहीकाळ दृश्यमानता कमी झाली होती. अचानक आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.