Badlapur : स्त्रीबीज तस्करी प्रकरण : स्त्रीबीज तस्करी प्रकरणी मंगळवारी सुनावणी, मनपाचे वैद्यकीय पथक मुंबईला जाणार

नाशिक : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथे स्त्रीबीज तस्करी प्रकरणी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पालिकेने मुंबई नाका येथील मालती आयव्हीएफ सेंटर सील केले होते. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी (दि. १२) रोजी मुंबईतील आरोग्य भवनात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी महापालिकेचे वैद्यकीय पथक जाणार असून, यावेळी पथकाकडून नाशिकमधील मालती सेंटरची माहिती सुनावणीदरम्यान सादर करण्यात येणार आहे.



बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणातील नाशिकशी संबंधित धागेदोरे तपासण्यासाठी यापूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथक बदलापूर येथे जाणार होते. मात्र, विविध कारणांमुळे वैद्यकीय विभागाचा दौरा लांबणीवर पडत होता. आता मात्र स्त्रीबीज प्रकरणी मुंबईतील आरोग्य भवनात सुनावणी होणार आहे. यासाठी नाशिक मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर उपस्थित राहणार आहेत. वैद्यकीय विभागाने मालती आयव्हीएफ केंद्रातून वादग्रस्त कागदपत्रे ताब्यात घेतली असून, या केंद्राची नोंदणी रद्द केली आहे.



या प्रकरणात नाशिक कनेक्शनही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मालती आयव्हीएफ केंद्राचा या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले होते. या केंद्राला नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोंदणी प्रमाणपत्र दिले होते. नाशिकमधील या केंद्रामार्फत बदलापूर येथे स्त्रीबीज तस्करी केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. बदलापूर प्रकरणातील मालती आयव्हीएफ केंद्राची नोंदणी नाशिकमध्ये असल्याने संबंधितांकडून शहरातही अशा प्रकारची स्त्रीबीज तस्करी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा; 'प्लॅन A' फसला, मग रचला हत्येचा कट

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या (Murder) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुण्याजवळील लोहगड (Lohgad

Iran-US War :ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आव्हान; इराणसह युद्धासाठी नव्या निधीची गरज

Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध (Iran-US War) पुन्हा तीव्र होत असताना अमेरिकेच्या संरक्षण खर्चात (Defense Spending) मोठी वाढ झाली आहे.

Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची

Maharashtra CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार... मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी लिहिलेलं पत्र

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित