Vivek Agnihotri's first reaction after Mamata Banerjee's defeat : ‘आता भीतीशिवाय जगा’; ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर दिगदर्शक विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सर्वत्र भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचा जल्लोष साजरा होत आहे. याच जल्लोषात आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील मागे नाहीत. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री यांनी "आता भीतीशिवाय जगा" असं म्हंटल आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.


नेमकं काय म्हणाले विवेक अग्निहोत्री ?


इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं की, “पुन्हा कधीच नाही. अनेकांना माहिती नाही, पण 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला बंगालमध्ये अडवण्यात आलं. माझा चित्रपट सिनेमागृहांतून काढून टाकण्यात आला आणि मला राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.







ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी 'द बंगाल फाइल्स'ला देखील पश्चिम बंगालमध्ये अनेक अडथळे आले. आमचा ट्रेलर लॉन्च होऊ दिला गेला नाही. आमच्यावर हल्ले झाले, मारहाण करण्यात आली. माझ्याविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आणि माझ्यावर राज्यात बहिष्कार टाकण्यात आला. इतकंच नव्हे, तर मला राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठीही जाता आलं नाही,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.


या सगळ्या घटनांचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी “सिर उठाकर चलो...” असं म्हणत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीपूर्वी त्यांनी 'द बंगाल फाइल्स'अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. “आम्ही कधीच हार मानली नाही. गुप्तपणे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला. आमचा लढा सुरूच ठेवला आणि अखेर हा अभूतपूर्व विजय मिळाला. बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय जगू शकता,” असंही त्यांनी म्हटलं.



दरम्यान, 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये अधिकृत बंदी घालण्यात आलेली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, अनेक सिनेमागृह मालकांनी परस्पर सहमतीने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती.


'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आयएम बुद्धा प्रोडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झाला आहे. १९४०च्या दशकातील बंगालमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, विशेषतः 'कलकत्ता हत्याकांडा'च्या दरम्यान झालेल्या हिंसाचारावर हा सिनेमा आधारित आहे. त्या काळातील अस्थिरता, विचारसरणीतील संघर्ष आणि अस्तित्वासाठीची झुंज यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Palash Muchhal : संगीतकार पलाश मुच्छल अडचणीत; स्मृतीशी धोका आणि आता आणखी नवं प्रकरण आलं समोर

सांगली : संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल याला आपण ओळखतो ते म्हणजे स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या अफेरमुळे, स्मृती

'Raja Shivaji' : ‘तासनतास श्वास रोखून…’ अफजलखानाच्या ६३ बेगमच्या हत्येचा थरारक सीन; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

मुंबई : ‘राजा शिवाजी’ या सिनेमातील अफजलखानाच्या बेगमच्या हत्येचा तो थरारक सीन प्रेक्षकांना अक्षरशः स्तब्ध करून

Vijay Thalapathy : करुणानिधींच्या मागे उभ्या असलेल्या या मुलाने डीएमके पक्षाला दिला मोठा धक्का, तुम्ही त्या मुलाला ओळखले का?

तामिळनाडू : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करत

Met Gala 2026 : म्हणून प्रियांका आणि दीपिकाने स्किप केलं मेट गाला २०२६

न्यू यॉर्क : जगातील सर्वात ग्लॅमरस फॅशन इव्हेंट 'मेट गाला २०२६' ४ मे रोजी सुरु झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही

Met Gala 2026 Ananya Birla : मेट गालावर अनन्या बिर्लाचा जलवा! सुबोध गुप्ताच्या मास्क लूकमुळे सर्वत्र चर्चा

मुंबई : अनन्या बिर्ला हिनं Met Gala 2026 मध्ये पहिल्याच उपस्थितीत जबरदस्त छाप पाडली. मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (Metropolitan

Raja Shivaji : “राजा शिवाजी”चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; केवळ तीन दिवसांत ४० कोटींचा टप्पा पार

मुंबई : राजा शिवाजी हा रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहांत