Vivek Agnihotri's first reaction after Mamata Banerjee's defeat : ‘आता भीतीशिवाय जगा’; ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर दिगदर्शक विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सर्वत्र भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचा जल्लोष साजरा होत आहे. याच जल्लोषात आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील मागे नाहीत. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री यांनी "आता भीतीशिवाय जगा" असं म्हंटल आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.


नेमकं काय म्हणाले विवेक अग्निहोत्री ?


इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं की, “पुन्हा कधीच नाही. अनेकांना माहिती नाही, पण 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला बंगालमध्ये अडवण्यात आलं. माझा चित्रपट सिनेमागृहांतून काढून टाकण्यात आला आणि मला राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.







ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी 'द बंगाल फाइल्स'ला देखील पश्चिम बंगालमध्ये अनेक अडथळे आले. आमचा ट्रेलर लॉन्च होऊ दिला गेला नाही. आमच्यावर हल्ले झाले, मारहाण करण्यात आली. माझ्याविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आणि माझ्यावर राज्यात बहिष्कार टाकण्यात आला. इतकंच नव्हे, तर मला राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठीही जाता आलं नाही,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.


या सगळ्या घटनांचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी “सिर उठाकर चलो...” असं म्हणत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीपूर्वी त्यांनी 'द बंगाल फाइल्स'अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. “आम्ही कधीच हार मानली नाही. गुप्तपणे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला. आमचा लढा सुरूच ठेवला आणि अखेर हा अभूतपूर्व विजय मिळाला. बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय जगू शकता,” असंही त्यांनी म्हटलं.



दरम्यान, 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये अधिकृत बंदी घालण्यात आलेली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, अनेक सिनेमागृह मालकांनी परस्पर सहमतीने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती.


'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आयएम बुद्धा प्रोडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झाला आहे. १९४०च्या दशकातील बंगालमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, विशेषतः 'कलकत्ता हत्याकांडा'च्या दरम्यान झालेल्या हिंसाचारावर हा सिनेमा आधारित आहे. त्या काळातील अस्थिरता, विचारसरणीतील संघर्ष आणि अस्तित्वासाठीची झुंज यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Mahaprabhu Jagannath : 'तुमच्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा': बाबा रामदेव यांचे ‘महाप्रभू जगन्नाथ’ला समर्थन; 17 जुलै रोजी देशभर प्रदर्शित होणार

रथयात्रेपूर्वी ‘महाप्रभू जगन्नाथ’च्या निर्मात्यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे घेतले आशीर्वाद; 17 जुलै रोजी

Shehnaaz Gill : 'वो मेरा बहोत अच्छा दोस्त है...'; राघव जुयालसोबतच्या नात्याच्या चर्चांवर शहनाज गिलची प्रतिक्रिया

अभिनेत्री शहनाज गिल आणि अभिनेता-डान्सर राघव जुयाल यांच्या नात्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहेत.

Priyanka Chopra : १० वर्षांनंतर उलगडलं गुपित! निक जोनसने प्रियांका चोप्राला पाठवला होता 'हा' पहिला मेसेज आणि मग सुरु झाली...

नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) या ग्लोबल कपलच्या प्रेमकहाणीची सुरुवात नेमकी कशी झाली, हा

LOCK UPP 2 : थेट शिवांगी जोशीच्या 'व्हर्जिनिटी'वरच बोट; LOCK UPP 2 मध्ये नेमकं चाललंय तरी काय?

 Lock Upp 2 :'लॉक अप २'मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शोदरम्यान शिल्पा शिंदे

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानची गूड न्यूज! स्वतःलाच दिलं लाखोंचं बर्थडे गिफ्ट

मुंबई : मराठी टेलिव्हिजन (Marathi Television) विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री (Actress) तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने चाहत्यांसोबत एक

Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला ठोठावली ३ लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांना त्यांच्या 'इंडियाज गॉट लेटंट'(India's Got Latent)