Vivek Agnihotri's first reaction after Mamata Banerjee's defeat : ‘आता भीतीशिवाय जगा’; ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर दिगदर्शक विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सर्वत्र भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचा जल्लोष साजरा होत आहे. याच जल्लोषात आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील मागे नाहीत. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री यांनी "आता भीतीशिवाय जगा" असं म्हंटल आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.


नेमकं काय म्हणाले विवेक अग्निहोत्री ?


इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं की, “पुन्हा कधीच नाही. अनेकांना माहिती नाही, पण 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला बंगालमध्ये अडवण्यात आलं. माझा चित्रपट सिनेमागृहांतून काढून टाकण्यात आला आणि मला राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.







ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी 'द बंगाल फाइल्स'ला देखील पश्चिम बंगालमध्ये अनेक अडथळे आले. आमचा ट्रेलर लॉन्च होऊ दिला गेला नाही. आमच्यावर हल्ले झाले, मारहाण करण्यात आली. माझ्याविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आणि माझ्यावर राज्यात बहिष्कार टाकण्यात आला. इतकंच नव्हे, तर मला राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठीही जाता आलं नाही,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.


या सगळ्या घटनांचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी “सिर उठाकर चलो...” असं म्हणत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीपूर्वी त्यांनी 'द बंगाल फाइल्स'अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. “आम्ही कधीच हार मानली नाही. गुप्तपणे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला. आमचा लढा सुरूच ठेवला आणि अखेर हा अभूतपूर्व विजय मिळाला. बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय जगू शकता,” असंही त्यांनी म्हटलं.



दरम्यान, 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये अधिकृत बंदी घालण्यात आलेली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, अनेक सिनेमागृह मालकांनी परस्पर सहमतीने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती.


'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आयएम बुद्धा प्रोडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झाला आहे. १९४०च्या दशकातील बंगालमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, विशेषतः 'कलकत्ता हत्याकांडा'च्या दरम्यान झालेल्या हिंसाचारावर हा सिनेमा आधारित आहे. त्या काळातील अस्थिरता, विचारसरणीतील संघर्ष आणि अस्तित्वासाठीची झुंज यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Standup Comedian Pranit More Apology : ‘ती माझी सर्वात मोठी चूक होती’; 370 Biryani प्रकरणावर प्रणित मोरेचे स्पष्टीकरण

मुंबई : 370 Biryani वाद (Controversy) आणि महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber) गुन्हा दाखल प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडियन (Stand-up Comedian) प्रणित मोरे

Deool Band 2 : 'देऊळ बंद २'ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; २३ दिवसांत ६५ कोटींचा टप्पा पार, १०० कोटींच्या दिशेने वाटचाल

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला देऊळ बंद २ (Deool Band 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, लवकरच...; चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव

Prajakta Mali : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी

Devendra Fadnavis on Pranit More Controversy : वादग्रस्त कंटेंटमुळे प्रणित मोरे अडचणीत; प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया!

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन (Stand-up Comedian) प्रणित मोरे (Pranit More) याच्या शोमधील (Show) काही वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्हिडीओ

Pranit More : प्रणित मोरेच्या शोवर सायबरचा मोठा दणका! डॉ. सेजल पवारसह तिघांविरोधात गुन्हा; समन्सही बजावले

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या वादग्रस्त शोप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मोठी कारवाई केली

'Deool Band 2' Box Office Collection : ‘देऊळ बंद २’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई! रितेश देशमुखच्या ‘वेड’ला टाकलं मागे

- २० व्या दिवशीही कमाईचा जोर कायम मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२६ हे वर्ष सुवर्णकाळ ठरत असून बॉक्स ऑफिसवर