'Raja Shivaji' : ‘तासनतास श्वास रोखून…’ अफजलखानाच्या ६३ बेगमच्या हत्येचा थरारक सीन; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

मुंबई : ‘राजा शिवाजी’ या सिनेमातील अफजलखानाच्या बेगमच्या हत्येचा तो थरारक सीन प्रेक्षकांना अक्षरशः स्तब्ध करून सोडतो. पण या सीनमागे किती मेहनत आणि धाडस दडलं आहे, याची खास माहिती स्वतः त्या अभिनेत्रीनेच उघड केली आहे.



राजा शिवाजी हा रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला सिनेमा सध्या थिएटरमध्ये जोरदार कमाई करत असून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवत आहे. या सिनेमात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन ते भाग्यश्री, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने सिनेमाला वेगळी उंची मिळवून दिली आहे.


या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक लहान-मोठे कलाकारही झळकत आहेत. तसेच मालिकांच्या दुनियेतील काही लोकप्रिय चेहरेही या सिनेमात दिसतात. विशेष म्हणजे, सिनेमातील लढाईचे सीन्स अत्यंत भव्य आणि वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आले असून त्यासाठी परदेशातून खास अ‍ॅक्शन टीम बोलावण्यात आली होती.



या सिनेमात काही अत्यंत साहसी आणि धोकादायक सीन्सदेखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाण्याखाली शूट करण्यात आलेला अंडरवॉटर सीन. कथेनुसार, स्वराज्याच्या दिशेने निघालेल्या अफजलखानाला पीर बाबाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यानंतर शेवटच्या भेटीसाठी त्याच्या ६३ बेगम त्याच्याकडे येतात आणि त्या सर्वांची तो पाण्यात बुडवून हत्या करतो.


या थरारक सीनमध्ये मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने अफजलखानाच्या बडी बेगमची भूमिका साकारली आहे. या सीनच्या शूटिंगसाठी दिशा आणि इतर कलाकारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या संपूर्ण अनुभवाबद्दल दिशाने सोशल मीडियावर सविस्तर माहिती शेअर केली आहे.


दिशाने या सीनचे काही BTS फोटो शेअर करत लिहिलं, “राजा शिवाजीमधील त्या बहुचर्चित आणि प्रभावी पाण्याखालील दृश्याचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास अनुभव होता.”





ती पुढे म्हणाली, “अफजलच्या बेगमच्या भूमिकेतून त्या प्रसंगाची ‘वेदना’ आणि ‘तीव्रता’ साकारताना मला खूप काही शिकायला मिळालं.”


या संपूर्ण वॉटर सीनबद्दल बोलताना दिशाने सांगितलं, “या सीनसाठी रितेश सरांनी आम्हा सगळ्यांना आधीपासूनच उत्कृष्ट ट्रेनिंग दिलं होतं. पाण्याखाली अभिनय करणं, तासनतास श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि प्रत्येक शॉटसाठी अचूक तयारी करणं, हे सगळं अत्यंत बारकाईने प्लॅन केलं गेलं होतं. त्यामुळे सेटवर आम्हाला पूर्णपणे सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटत होता.”


ती पुढे म्हणाली, “सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक गोष्टीची अतिशय काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे इतका कठीण आणि धोकादायक सीनदेखील आम्हाला सहजपणे पूर्ण करता आला. अशा टीमसोबत काम करणं खरंच भाग्याची गोष्ट आहे.”

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा