'Raja Shivaji' : ‘तासनतास श्वास रोखून…’ अफजलखानाच्या ६३ बेगमच्या हत्येचा थरारक सीन; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

मुंबई : ‘राजा शिवाजी’ या सिनेमातील अफजलखानाच्या बेगमच्या हत्येचा तो थरारक सीन प्रेक्षकांना अक्षरशः स्तब्ध करून सोडतो. पण या सीनमागे किती मेहनत आणि धाडस दडलं आहे, याची खास माहिती स्वतः त्या अभिनेत्रीनेच उघड केली आहे.



राजा शिवाजी हा रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला सिनेमा सध्या थिएटरमध्ये जोरदार कमाई करत असून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवत आहे. या सिनेमात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन ते भाग्यश्री, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने सिनेमाला वेगळी उंची मिळवून दिली आहे.


या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक लहान-मोठे कलाकारही झळकत आहेत. तसेच मालिकांच्या दुनियेतील काही लोकप्रिय चेहरेही या सिनेमात दिसतात. विशेष म्हणजे, सिनेमातील लढाईचे सीन्स अत्यंत भव्य आणि वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आले असून त्यासाठी परदेशातून खास अ‍ॅक्शन टीम बोलावण्यात आली होती.



या सिनेमात काही अत्यंत साहसी आणि धोकादायक सीन्सदेखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाण्याखाली शूट करण्यात आलेला अंडरवॉटर सीन. कथेनुसार, स्वराज्याच्या दिशेने निघालेल्या अफजलखानाला पीर बाबाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यानंतर शेवटच्या भेटीसाठी त्याच्या ६३ बेगम त्याच्याकडे येतात आणि त्या सर्वांची तो पाण्यात बुडवून हत्या करतो.


या थरारक सीनमध्ये मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने अफजलखानाच्या बडी बेगमची भूमिका साकारली आहे. या सीनच्या शूटिंगसाठी दिशा आणि इतर कलाकारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या संपूर्ण अनुभवाबद्दल दिशाने सोशल मीडियावर सविस्तर माहिती शेअर केली आहे.


दिशाने या सीनचे काही BTS फोटो शेअर करत लिहिलं, “राजा शिवाजीमधील त्या बहुचर्चित आणि प्रभावी पाण्याखालील दृश्याचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास अनुभव होता.”





ती पुढे म्हणाली, “अफजलच्या बेगमच्या भूमिकेतून त्या प्रसंगाची ‘वेदना’ आणि ‘तीव्रता’ साकारताना मला खूप काही शिकायला मिळालं.”


या संपूर्ण वॉटर सीनबद्दल बोलताना दिशाने सांगितलं, “या सीनसाठी रितेश सरांनी आम्हा सगळ्यांना आधीपासूनच उत्कृष्ट ट्रेनिंग दिलं होतं. पाण्याखाली अभिनय करणं, तासनतास श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि प्रत्येक शॉटसाठी अचूक तयारी करणं, हे सगळं अत्यंत बारकाईने प्लॅन केलं गेलं होतं. त्यामुळे सेटवर आम्हाला पूर्णपणे सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटत होता.”


ती पुढे म्हणाली, “सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक गोष्टीची अतिशय काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे इतका कठीण आणि धोकादायक सीनदेखील आम्हाला सहजपणे पूर्ण करता आला. अशा टीमसोबत काम करणं खरंच भाग्याची गोष्ट आहे.”

Comments
Add Comment

Smriti & Palash controversy : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या प्रकरणात नव्हे वळण ; पलाश मुच्छलला होणार अटक ?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीत क्षेत्रातील गायक पलाश मुच्छल(Palash

Lock Up 2 : गोविंदासमोर सुनीता आहुजाची भावनिक एक्झिट; 'लॉक अप २'मध्ये घडला अनपेक्षित क्षण

Lock Up 2 : 'लॉक अप २' (Lock Up 2 ) या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री सुनीता आहुजाचा (Sunita Ahuja) प्रवास संपला असून, तिच्या एक्झिटदरम्यान

Medha Manjrekar : अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची कॅन्सरशी झुंज, शेअर केली भावुक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत

Rinku Rajguru Album Song : ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूचा नवा अंदाज; पहिलं अल्बम साँग ‘बाप विठुराया’ प्रदर्शित

मुंबई : ‘सैराट’ (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Aamir Khan 3 Wives : १०० कोटींची गुंतवणूक, तिन्ही पत्नींसाठी स्वतंत्र मजले; आमिर खानच्या नव्या घराची चर्चा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तिसरं लग्न

'Deool Band 2' Marathi Movie : 'देऊळ बंद २'ला शाहरुख खानची साथ; ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) चर्चेत असलेल्या ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2) या चित्रपटाला बॉलिवूडचा (Bollywood) ‘किंग