मुंबई : ‘राजा शिवाजी’ या सिनेमातील अफजलखानाच्या बेगमच्या हत्येचा तो थरारक सीन प्रेक्षकांना अक्षरशः स्तब्ध करून सोडतो. पण या सीनमागे किती मेहनत आणि धाडस दडलं आहे, याची खास माहिती स्वतः त्या अभिनेत्रीनेच उघड केली आहे.
तामिळनाडू : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करत ‘कलाइग्नार’ एम. करुणानिधी यांच्यावर अप्रत्यक्ष ...
राजा शिवाजी हा रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला सिनेमा सध्या थिएटरमध्ये जोरदार कमाई करत असून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवत आहे. या सिनेमात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन ते भाग्यश्री, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने सिनेमाला वेगळी उंची मिळवून दिली आहे.
या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक लहान-मोठे कलाकारही झळकत आहेत. तसेच मालिकांच्या दुनियेतील काही लोकप्रिय चेहरेही या सिनेमात दिसतात. विशेष म्हणजे, सिनेमातील लढाईचे सीन्स अत्यंत भव्य आणि वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आले असून त्यासाठी परदेशातून खास अॅक्शन टीम बोलावण्यात आली होती.
न्यू यॉर्क : जगातील सर्वात ग्लॅमरस फॅशन इव्हेंट 'मेट गाला २०२६' ४ मे रोजी सुरु झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगळे आणि हटके फॅशन, आऊटफिट पाहायला ...
या सिनेमात काही अत्यंत साहसी आणि धोकादायक सीन्सदेखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाण्याखाली शूट करण्यात आलेला अंडरवॉटर सीन. कथेनुसार, स्वराज्याच्या दिशेने निघालेल्या अफजलखानाला पीर बाबाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यानंतर शेवटच्या भेटीसाठी त्याच्या ६३ बेगम त्याच्याकडे येतात आणि त्या सर्वांची तो पाण्यात बुडवून हत्या करतो.
दिशाने या सीनचे काही BTS फोटो शेअर करत लिहिलं, “राजा शिवाजीमधील त्या बहुचर्चित आणि प्रभावी पाण्याखालील दृश्याचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास अनुभव होता.”
ती पुढे म्हणाली, “अफजलच्या बेगमच्या भूमिकेतून त्या प्रसंगाची ‘वेदना’ आणि ‘तीव्रता’ साकारताना मला खूप काही शिकायला मिळालं.”
ती पुढे म्हणाली, “सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक गोष्टीची अतिशय काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे इतका कठीण आणि धोकादायक सीनदेखील आम्हाला सहजपणे पूर्ण करता आला. अशा टीमसोबत काम करणं खरंच भाग्याची गोष्ट आहे.”