PM Vishwakarma Yojana : ऐकलंत का ? मोदी सरकार ३ लाख रुपये देतंय, पण कशासाठी ? काय आहे सरकारची योजना ? जाणून घ्या

PM Vishwakarma Yojana: सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (PM Vishwakarma Yojana). प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केलीय. दरम्यान, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.


गेल्या काही वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक व्यवसाय मागे पडत होते. सुतारकाम, लोहारकाम, मातीशिल्प, शिवणकाम यांसारख्या व्यवसायांना योग्य बाजारपेठ आणि आर्थिक मदत मिळत नव्हती. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही कारागिरांसाठी ‘लाइफलाइन’ ठरत आहे. या योजनेमुळे कारागिरांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. (Prime Minister Vishwakarma Skill Development Scheme)



३ लाखांपर्यंत कर्ज सुविधा


या योजनेची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे. पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपये देण्यात येते. एकूण ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज फक्त आणि फक्त ५% व्याजदराने उपलब्ध असल्याने लघु उद्योगांना मोठा आर्थिक हातभार मिळतो. या कर्जाच्या मदतीने अनेक कारागिरांनी आपले व्यवसाय विस्तारले आहेत. ज्यामुळे व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत मिळाळी आहे. (Prime Minister Vishwakarma Skill Development Scheme)


या योजनेअंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्ये अधिक विकसित केली जातात. प्रशिक्षण काळात दररोज ५०० रुपये मानधन दिले जाते. आधुनिक साधने खरेदीसाठी १५,००० रुपयांचे अनुदान दिले जाते . यामुळे पारंपरिक कामकाज अधिक जलद, अचूक आणि स्पर्धात्मक बनत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारागिरांना अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. (PM Vishwakarma Yojana)



१८ प्रकारच्या कारागिरांना योजनेचा फायदा


या योजनेत विविध पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सुतार, लोहार, सोनार, कुंभार, नाभिक, मोची, टेलर, गवंडी, माती शिल्पकार, दगडकाम करणारे, जाळी तयार करणारे अशा एकूण १८ प्रकारच्या कारागिरांना लाभ मिळतो. यामुळे विविध क्षेत्रातील कौशल्य असलेल्या कामगारांना या योजनेचा फायदा घेता येतो.

तुम्हांलाही योजनेचा लाभ घ्यायचा आहे ?


तुम्हांलाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असेल तुम्ही अर्ज करू शकतात. जसे की, महा-सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टल. अर्जानंतर कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान मंजूर केले जाते.

Comments
Add Comment

Karnataka News : पावसात ४० वर्षांचं चंदनाचं झाड कोसळलं; ८५ वर्षीय वृद्ध लखपती!

कर्नाटक : पावसाळ्यात (Monsoon) मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि तुफान वाऱ्यांमुळे (Strong Winds) झाडं कोसळल्याच्या घटना वारंवार घडतात. अशा

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक