PM Vishwakarma Yojana : ऐकलंत का ? मोदी सरकार ३ लाख रुपये देतंय, पण कशासाठी ? काय आहे सरकारची योजना ? जाणून घ्या

PM Vishwakarma Yojana: सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (PM Vishwakarma Yojana). प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केलीय. दरम्यान, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.


गेल्या काही वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक व्यवसाय मागे पडत होते. सुतारकाम, लोहारकाम, मातीशिल्प, शिवणकाम यांसारख्या व्यवसायांना योग्य बाजारपेठ आणि आर्थिक मदत मिळत नव्हती. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही कारागिरांसाठी ‘लाइफलाइन’ ठरत आहे. या योजनेमुळे कारागिरांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. (Prime Minister Vishwakarma Skill Development Scheme)



३ लाखांपर्यंत कर्ज सुविधा


या योजनेची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे. पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपये देण्यात येते. एकूण ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज फक्त आणि फक्त ५% व्याजदराने उपलब्ध असल्याने लघु उद्योगांना मोठा आर्थिक हातभार मिळतो. या कर्जाच्या मदतीने अनेक कारागिरांनी आपले व्यवसाय विस्तारले आहेत. ज्यामुळे व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत मिळाळी आहे. (Prime Minister Vishwakarma Skill Development Scheme)


या योजनेअंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्ये अधिक विकसित केली जातात. प्रशिक्षण काळात दररोज ५०० रुपये मानधन दिले जाते. आधुनिक साधने खरेदीसाठी १५,००० रुपयांचे अनुदान दिले जाते . यामुळे पारंपरिक कामकाज अधिक जलद, अचूक आणि स्पर्धात्मक बनत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारागिरांना अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. (PM Vishwakarma Yojana)



१८ प्रकारच्या कारागिरांना योजनेचा फायदा


या योजनेत विविध पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सुतार, लोहार, सोनार, कुंभार, नाभिक, मोची, टेलर, गवंडी, माती शिल्पकार, दगडकाम करणारे, जाळी तयार करणारे अशा एकूण १८ प्रकारच्या कारागिरांना लाभ मिळतो. यामुळे विविध क्षेत्रातील कौशल्य असलेल्या कामगारांना या योजनेचा फायदा घेता येतो.

तुम्हांलाही योजनेचा लाभ घ्यायचा आहे ?


तुम्हांलाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असेल तुम्ही अर्ज करू शकतात. जसे की, महा-सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टल. अर्जानंतर कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान मंजूर केले जाते.

Comments
Add Comment

MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ मुंबई : विधानपरिषदेच्या

Shiv Thakare :शिव ठाकरेचे मुंबईतील घर पाहिले का? ‘या’ गोष्टींनी वेधले लक्ष

Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक

Yash Dayal : हा माझा निर्णय नव्हता; यश दयालच्या वक्तव्यानं खळबळ, RCB व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष सवाल

IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Divyanka Tripathi Dahiya : लग्नाच्या 10 वर्षांनी प्रेग्नंट दिव्यांका त्रिपाठी, जुळ्या मुलांची झाली आई !

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता विवेक दहिया (Vivek Dahiya) यांच्या आयुष्यात नवा