Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील आरोपी, ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. पोलीस प्रशासनही या प्रकरणाने खडबडून जागे झाले असून या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी गुन्हा करण्यामागचा आरोपीचा हेतू जाणून घेण्यासाठी आरोपीची उलटतपासणी सुरू केली आहे. या उलट तपासणीत आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांना अजब आणि धक्कादायक अशी उत्तरे दिली आहेत. (Nasarapur minor rape case )



आरोपीच्या जबाबाने पोलिसांनाही धक्का


पोलिसांनी भीमराव कांबळेची कसून चौकशी केली असता आरोपीने जे उत्तर दिलं, त्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. “अत्याचार झाला त्या दिवशी मी नशेत होतो,” असं थंड डोक्याने आरोपीने उत्तर दिलं आहे. आरोपीने नशेचा आधार घेत स्वत:चा बचाव करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाला तो बचावासाठी असे बोलत असल्याचा संशय आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी त्याची कसून चौकशी करत आहेत. (Nasarapur minor rape case )


चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार अन हत्या


शुक्रवारी १ मे रोजी भोर तालुक्यातल्या नसरापूर या ठिकाणी संतापजनक घटना घडली. नराधम ६५ वर्षीय आरोपीने सुट्टीमध्ये मामाच्या गावाला आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा पाठलाग करून तिला वासरं दाखवण्याचा बहाणा करत तिला गोठ्यात नेले. त्याठिकणी तिच्यावर अत्याचार केले. आणि तिची निर्घृण हत्या केली. (Nasarapur minor rape case )कुणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसोबत तिचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिचा मृतदेह सापडला. यानंतर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तातडीने पोलिसांना पाचारण करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली.



त्याला तसाच ठेचून मारला पाहिजे – आरोपीची पत्नी


नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीच्या वृद्ध पत्नीने या घटनेवर व आपल्या पतीवर संताप व्यक्त केला आहे. गेल्या १० वर्षांपासून आपला त्याच्याशी संपर्क नसल्याचंदेखील नमूद केलं. “त्या बाळाची हत्या झाली त्याच ठिकाणी त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे. मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. माझ्यापर्यंत कुणी त्याचा अंत्यविधी झालाय वगैरे सांगायलाही येऊ नये. गेल्या १० वर्षांपासून तो आमच्या संपर्कात नाहीये. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी”, असं त्या म्हणाल्या.“फक्त फाशी नाही, ठेचला पाहिजे त्याला. जिवंत जाळला पाहिजे त्याला. तरीही माझ्या मनाची झालेली आग शांत होणार नाही. त्याचं नाव आमच्या नावाला जोडलंय त्यामुळे आम्हाला लोक जे काही बोलतील ते ऐकून घ्यावं लागेल”, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.


 
Comments
Add Comment

Water storage : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि