PAK VS IND : कधी होणार भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना ? आली मोठी अपडेट

BCCI UPDATE : भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात. स्टेडियम हाऊसफुल होते. टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म या दोन्ही ठिकाणी सामना बघण्यासाठी कोट्यवधी प्रेक्षक येतात. यामुळे मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या भारत - पाकिस्तान मालिका पुन्हा सुरू होणार का ? यावरून क्रीडाप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने धोरण स्पष्ट केले आहे.


पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाचा पुरस्कार करणे तसेच दहशतवादी कारवायांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या मदत करणे थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत भारत खेळणार नाही. पण आयसीसीच्या बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सहभागी असला तरीही भारत खेळेल. क्रीडा मंत्रालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये जाहीर केलेले हे धोरण कायम असल्याचे जाहीर केले आहे.



भारताला भविष्यात मोठ्या जागतिक क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवायचे आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय नियम, संकेतांचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळेच आयसीसीच्या बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सहभागी असला तरीही भारत खेळेल. पण इतर कोणत्याही स्पर्धेत भारत पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळणार नाही अशी भारताची अधिकृत भूमिका आहे. या भूमिकेत तसूभरही बदल केला नसल्याचा पुनरुच्चार देशाच्या क्रीडा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला आहे.


ऑगस्ट २०२५ मध्ये यूएई येथे आशिया कप स्पर्धेत भारत - पाकिस्तान खेळणार की नाही यावरून वाद झाला, त्यावेळी पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत देशाच्या क्रीडा मंत्रालयाने धोरण जाहीर केले. हेच धोरण क्रीडा मंत्रालयाने कायम ठेवले आहे. भारत २०३० च्या राष्ट्रकुल आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठीच आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी असला तरीही खेळू पण इतरत्र पाकिस्तान विरोधात खेळणार नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे. भारत सरकारच्या या ठाम भूमिकेमुळे सध्या तरी भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिकेची कोणतीही शक्यता नाही, परंतु आयसीसी (ICC) किंवा इतर बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील