Mother and daughter Sucide : नागपुरात आई आणि मुलीची आत्महत्या; जमिनीसाठी पतीने केला अमानुष छळ

नागपूर: नागपुरातील व्यंकटेशनगरमध्ये घडलेल्या माय-लेकीच्या आत्महत्येच्या प्रकरणामागील धक्कादायक कारण अखेर समोर आले आहे. जमिनीच्या वादातून पती आणि सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून दोघींनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती तपास केल्यानंतर समोर आली आहे.



नागपुरातील व्यंकटेशनगर परिसरात आई आणि मुलीने एकाच वेळी गळफास लाऊन आत्महत्या केली होती, या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाचा तपास करताना नंदनवन पोलिसांना गंभीर आणि संतापजनक माहिती मिळाली आहे. पत्नी आणि तिच्या आईच्या नावावर असलेली संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पती लोकेश ब्रह्मे आणि त्याच्या कुटुंबीयांनी सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळेच या दोघींनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.


पैशांसाठी छळ, बाळाच्या मृत्यूनंतर वाढला त्रास


१ मे २०२६ रोजी संगीता श्रीराम ढबाले (वय ५२) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (वय २९) यांनी आत्महत्या केली होती. तपासादरम्यान समोर आले की, आकांक्षाच्या लग्नानंतर तिचा पती लोकेश, सासू अनसूया, सासरा सुधाकर, नणंद प्राची आणि तिचा पती अमोल डफ यांनी तिचा छळ सुरू केला होता, माहेरून पैसे आणण्यासाठी हा छळ सुरू होता. दोन महिन्यांपूर्वी आकांक्षाला मुलगी झाली होती, मात्र जन्मानंतर लगेचच त्या बाळाचा मृत्यू झाला. या दु:खद घटनेनंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावरचा छळ आणखी तीव्र केला.



जमिनीवर डोळा, अत्याचाराची परिसीमा


या छळाची परिसीमा तेव्हा गाठली गेली, जेव्हा आरोपींनी आकांक्षा आणि तिची आई संगीता यांच्या नावावर असलेली जमीन लोकेशच्या नावावर करण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. या मागणीसाठी आकांक्षाला वारंवार मारहाण करण्यात येत होती आणि तिला अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. या अखंड त्रासाला कंटाळून आकांक्षा आपल्या आईकडे व्यंकटेशनगर येथे आली आणि शेवटी माय-लेकीने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली व आपले जीवन संपवले.


या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी आकांक्षाचे मामा विलास केशवराव पिसे यांच्या तक्रारीवरून पती लोकेश ब्रह्मे याच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

Weather Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट': पुढचे १० तास देशासाठी धोक्याचे! जाणून घ्या महाराष्ट्राचा अंदाज काय ?

देशातील हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) अत्यंत धोक्याचा इशारा दिला आहे.

Sangali Tadkadtai : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा वारसा; कोकणचा ‘संकासूर’ आणि सांगलीची ‘तडकडताई’

महाराष्ट्र: महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. येथे केवळ सण-उत्सव साजरे केले जात नाहीत, तर शतकानुशतके चालत

Pune News : मदरसा क्लासच्या बहाण्याने घरी थांबवलं आणि १४ वर्षाच्या मुलीला नको नको तिथे... पुण्यातील कात्रज हादरले!

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असतानाच, आता

Amravati Murder Case : सिनेमापेक्षाही भयंकर! आधी हाताचा पंजा छाटला अन् मग कोयत्याने सपासप वार केला; नेमकं कारण काय?

प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वाट मिटवायला बोलावून केला घात, २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या अमरावती : अमरावती

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांचे ४८ हजार कोटींचे थकीत वीजबिल माफ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; कर्जमाफीबद्दल राज्यातील शेतकऱ्यांकडून सन्मान मुंबई : राज्यातील

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! गोव्याहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ३ जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर