Mother and daughter Sucide : नागपुरात आई आणि मुलीची आत्महत्या; जमिनीसाठी पतीने केला अमानुष छळ

नागपूर: नागपुरातील व्यंकटेशनगरमध्ये घडलेल्या माय-लेकीच्या आत्महत्येच्या प्रकरणामागील धक्कादायक कारण अखेर समोर आले आहे. जमिनीच्या वादातून पती आणि सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून दोघींनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती तपास केल्यानंतर समोर आली आहे.



नागपुरातील व्यंकटेशनगर परिसरात आई आणि मुलीने एकाच वेळी गळफास लाऊन आत्महत्या केली होती, या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाचा तपास करताना नंदनवन पोलिसांना गंभीर आणि संतापजनक माहिती मिळाली आहे. पत्नी आणि तिच्या आईच्या नावावर असलेली संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पती लोकेश ब्रह्मे आणि त्याच्या कुटुंबीयांनी सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळेच या दोघींनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.


पैशांसाठी छळ, बाळाच्या मृत्यूनंतर वाढला त्रास


१ मे २०२६ रोजी संगीता श्रीराम ढबाले (वय ५२) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (वय २९) यांनी आत्महत्या केली होती. तपासादरम्यान समोर आले की, आकांक्षाच्या लग्नानंतर तिचा पती लोकेश, सासू अनसूया, सासरा सुधाकर, नणंद प्राची आणि तिचा पती अमोल डफ यांनी तिचा छळ सुरू केला होता, माहेरून पैसे आणण्यासाठी हा छळ सुरू होता. दोन महिन्यांपूर्वी आकांक्षाला मुलगी झाली होती, मात्र जन्मानंतर लगेचच त्या बाळाचा मृत्यू झाला. या दु:खद घटनेनंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावरचा छळ आणखी तीव्र केला.



जमिनीवर डोळा, अत्याचाराची परिसीमा


या छळाची परिसीमा तेव्हा गाठली गेली, जेव्हा आरोपींनी आकांक्षा आणि तिची आई संगीता यांच्या नावावर असलेली जमीन लोकेशच्या नावावर करण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. या मागणीसाठी आकांक्षाला वारंवार मारहाण करण्यात येत होती आणि तिला अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. या अखंड त्रासाला कंटाळून आकांक्षा आपल्या आईकडे व्यंकटेशनगर येथे आली आणि शेवटी माय-लेकीने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली व आपले जीवन संपवले.


या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी आकांक्षाचे मामा विलास केशवराव पिसे यांच्या तक्रारीवरून पती लोकेश ब्रह्मे याच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा