Khalistani Terrorists : कॅनडाचा मोठा खुलासा! खलिस्तानी अतिरेकी ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ घोषित

कॅनडाच्या प्रमुख गुप्तचर संस्थेने खलिस्तानी अतिरेक्यांविरोधात गंभीर इशारा देत त्यांना देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. Canadian Security Intelligence Service (CSIS) च्या २०२५ च्या सार्वजनिक अहवालात हा खुलासा करण्यात आला असून, कॅनडामधील काही गट भारताशी संबंधित हिंसक कारवायांना आर्थिक आणि संघटनात्मक मदत करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


अहवालानुसार, कॅनडामध्ये कार्यरत असलेले काही खलिस्तानी अतिरेकी (CBKEs) देशातील व्यवस्थेचा वापर करून निधी गोळा करत आहेत आणि तो हिंसक कारवायांसाठी वळवत आहेत. “हे घटक कॅनडाच्या समाजात मिसळलेले असून, स्थानिक संस्थांचा वापर करून आपला अजेंडा पुढे नेत आहेत,” असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.



मात्र, स्वतंत्र ‘खलिस्तान’ची मागणी करणे हे कॅनडामध्ये कायदेशीर असल्याचेही CSIS ने स्पष्ट केले आहे. परंतु, हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या आणि भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान गटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.


अहवालात १९८५ मधील Air India Flight १८२ bombing चा उल्लेख करत, त्या हल्ल्यामागे अशाच अतिरेकी नेटवर्कचा हात असल्याचे नमूद केले आहे. या भीषण हल्ल्यात ३२९ जणांचा मृत्यू झाला होता, जो आजही कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.


दरम्यान, परकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर भारतचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसोबत भारतावरही कॅनडामध्ये प्रभाव टाकण्याचा आरोप करण्यात आला आहे. काही राजकारणी, पत्रकार आणि इंडो-कॅनेडियन समुदायातील व्यक्तींशी गुप्त संबंध प्रस्थापित करून भारत आपले हितसंबंध साधत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.



ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२३ मध्ये जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येत भारताचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता, जो भारताने फेटाळला होता.


त्यानंतर दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली असून, राजनैतिक संवाद पुन्हा सुरू करण्यात आला आहे. व्यापार, गुंतवणूक आणि कायदा अंमलबजावणी क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



दरम्यान, भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल पुढील महिन्यात कॅनडाला मोठ्या व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा अहवाल अधिकच महत्त्वाचा ठरत आहे.

Comments
Add Comment

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Mumbai-Pune Old Highway Accident : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात; कार पेटून चालकाचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर काल म्हणजेच मंगळवार ५ मे रोजी पहाटे एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक अपघात घडला.

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : टीसीएस प्रकरणातील चौघांना संशयितांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Breaking News : पुणे पुन्हा हादरलं! ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आजोबांकडून नातीवर अत्याचार

पुणे : पुण्यातील नसरापूरमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता पुन्हा एकदा

Mayor Ritu Tawde : नालेसफाई कामांच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसवा ; महापौर रितू तावडे यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत ज्या ठिकाणी नाले स्वच्छतेची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे