मुंबई : मुंबई इंडियन्सनं अखेर वानखेडे स्टेडियमवर दमदार विजय मिळवत चाहत्यांना दिलासा दिला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रेयान रिकल्टन यांच्या तुफानी सलामी भागीदारीनं मुंबईच्या विजयाचा पाया भक्कम केला, तर शेवटी नमन धीर यानं शांत आणि परिपक्व खेळी करत संघाला विजयापर्यंत नेलं.
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं २२८ धावांचा प्रचंड स्कोअर उभारला. निकोलस पूरन यानं केवळ २१ चेंडूत ६३ धावा करत मुंबईच्या गोलंदाजांवर तुटून पडत डावाला वेग दिला. त्याला मिशेल मार्श (४४) आणि एडन मार्करम (३१) यांची साथ मिळाली. मधल्या फळीत हिम्मत सिंह यानं ४० धावांची उपयुक्त खेळी करत लखनौला २०० पार नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
नवी दिल्ली : आजघडीला गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत कमळ फुलल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. देशातील ५ राज्यांमधील ...
२२९ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि रिकल्टन यांनी पहिल्याच षटकापासून आक्रमण करत लखनौच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. दोघांनी मिळून १४३ धावांची भक्कम भागीदारी रचत सामन्याचा कल मुंबईकडे वळवला. ही भागीदारी मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली.
रिकल्टन ८३ धावांवर बाद झाला, मात्र तोपर्यंत सामना मुंबईच्या हातात आला होता. त्यानंतर रोहित शर्मानंही ८४ धावांची शानदार खेळी केली. दोघांच्या खेळीमुळे लखनौच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास ढासळला.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे तर आसाम आणि पुदुच्चेरीत एनडीएची सत्ता स्थापन होणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा ...
मात्र, रोहित बाद झाल्यानंतर थोडीशी घसरण पाहायला मिळाली. सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकला नाही, तर मधल्या फळीत काही विकेट्स झटपट पडल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत सामन्यात रंगत निर्माण झाली.
अशा वेळी नमन धीर यानं जबाबदारी स्वीकारत संयमी फलंदाजी केली. त्यानं योग्य वेळी फटकेबाजी करत आणि स्ट्राइक रोटेट करत मुंबईला १८.४ षटकांत ४ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवलं आणि विजय निश्चित केला. त्याची ही खेळी संघासाठी निर्णायक ठरली.
लखनऊ : आयपीएल २०२६ मध्ये आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी नऊ पैकी सहा सामने जिंकून १२ गुण मिळवले आहेत. ...
गुणतालिकेवर या सामन्याचा मोठा परिणाम झाला नसला, तरी मुंबईच्या या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे. वानखेडेवर मिळालेला हा विजय मुंबईसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.