PM Narendra Modi : “गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे” – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आजघडीला गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत कमळ फुलल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची निकाल जाहीर झाल्यानंतर ते सोमवारी संध्याकाळी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.



यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा मी याच ठिकाणाहून आपण सर्वांना सांगितले होते की गंगा बिहारमधून पुढे वाहत गंगासागरपर्यंत जाते. आज बंगालमधील विजयासह गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत सर्वत्र कमळच कमळ फुलले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगाल या गंगेच्या किनारी वसलेल्या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता आहे. पाचही राज्यांमधील जनतेला धन्यवाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, हा दिवस ऐतिहासिक आहे, कारण पक्षाने तीन विधानसभांमध्ये भाजपने अव्वल स्थान मिळवले आहे. आजचा दिवस कामगिरी, स्थिरता आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचारसरणीवरील विश्वास व्यक्त करण्याचा दिवस आहे, तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संदेश देणारा दिवस असल्याचे मोदी म्हणाले.



ते पुढे म्हणाले, “२०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा (PM Narendra Modi) उमेदवार म्हणून जबाबदारी दिली आणि मी काशी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो असताना पत्रकारांनी मला घेरले होते. त्या वेळी माझ्या मनातून सहज एक भावना व्यक्त झाली आणि मी म्हणालो होतो की मी स्वतःहून आलो नाही, मला कोणी पाठवलेले नाही, मला माता गंगाने बोलावले आहे. आणि आज प्रत्येक क्षणी मला जाणवते की माता गंगेचा आशीर्वाद सतत आपल्यावर राहिला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळेच कमळ फुलले आहे, तसेच मतदारांनी जगाला दाखवून दिले की भारताला लोकशाहीची जननी का म्हटले जाते. त्यांनी म्हटले की जय-पराजय हा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे. परंतु पाच राज्यांतील जनतेने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की भारताला ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ का म्हटले जाते. लोकशाही आमच्यासाठी केवळ एक व्यवस्था नाही, ती आमच्या रक्तात वाहणारी संस्कृती आहे. आज केवळ भारताची लोकशाहीच जिंकलेली नाही, तर भारताचे संविधान, संवैधानिक संस्था आणि लोकशाही प्रक्रिया यांचाही विजय झाला आहे. (PM Narendra Modi)



पश्चिम बंगालमध्ये सुमारे ९३ टक्के मतदान होणे हे स्वतःमध्ये ऐतिहासिक आहे. आसाम, तमिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही मतदानाचे नवे विक्रम नोंदवले गेले असून महिलांचा सहभाग विशेषत्वाने अधिक होता. हे भारतीय लोकशाहीचे अत्यंत उज्ज्वल चित्र असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ४ मेची ही संध्याकाळ जरी मावळत असली तरी बंगालच्या पवित्र भूमीवर आज नव्या सूर्योदयाची सुरुवात झाली आहे. या क्षणाची अनेक पिढ्या वाट पाहत होत्या. भाजपने जिंकलेल्या जागा या केवळ निवडणुकीतील आकडे नाहीत, तर त्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहेत ज्याने भीती, तुष्टीकरण आणि हिंसेच्या राजकारणाला मुळापासून संपवल्याचे पंतप्रधांनी यावेळी सांगितले.(PM Narendra Modi)

Comments
Add Comment

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : टीसीएस प्रकरणातील चौघांना संशयितांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Breaking News : पुणे पुन्हा हादरलं! ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आजोबांकडून नातीवर अत्याचार

पुणे : पुण्यातील नसरापूरमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता पुन्हा एकदा

Mayor Ritu Tawde : नालेसफाई कामांच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसवा ; महापौर रितू तावडे यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत ज्या ठिकाणी नाले स्वच्छतेची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

Kandivali Dr. Babasaheb Ambedkar Hospital : कांदिवलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी प्रकल्प कामे वेगात

- अतिरिक्त् आयुक्त विपीन शर्मा यांनी घेतला प्रत्यक्ष ठिकाणी जावून आढावा मुंबई विशेष प्रतिनिधी पश्चिम

IIT Mumbai : आयआयटी मुंबईच्या परिसरात इमारत बाधकामांमध्ये बाधित २३७ झाडे कापली, तर ४०० झाडे केली पुनर्रोपित

- ड्रोन सेंटर सर्व्हिस ब्लॉकच्या बांधकामांमध्ये आणखी ५४ झाडे बाधित मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पवई येथील