West Bengal : पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता, ममता बॅनर्जींचा विधानसभा निवडणुकीत पराभव

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे तर आसाम आणि पुदुच्चेरीत एनडीएची सत्ता स्थापन होणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. शुभेंदू अधिकारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांना ७३ हजार ९१७ मते मिळाली तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मते मिळाली. सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या विरोधातील निवडणूक १५ हजार १०५ मतांनी जिंकली. तब्बल २० फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर अधिकारी यांनी निवडणूक जिंकली.



निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार पश्चिम बंगालमध्ये २९४ पैकी २९२ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने १८२ जागा जिंकल्या असून २५ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक १४७ चा आकडा पार केल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे. आसामच्या १२६ पैकी १२४ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने ८१ जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने १८ जागा जिंकल्या आणि एका जागेवर आघाडी घेतली आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट आणि आसाम गण परिषद यांनी प्रत्येकी १० तर ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि रायजोर दलने प्रत्येकी २ जागा जिंकल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. आसाममध्ये एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. तसेच पुदुच्चेरीत ३० पैकी २९ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. ऑल इंडिया एनआर काँग्रेसने ११ जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. द्रमुकने पाच जागा जिंकल्या आहेत. भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. टीव्हीकेने दोन तर काँग्रेस, लाचिया जननायक कच्ची, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, एनवायएमके यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. या व्यतिरिक्त तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. पुदुच्चेरीतही एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे.



केरळमध्ये सर्व १४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसने ६३, सीपीआयएमने २६, आययूएमएलने २२, सीपीआयने ८, केईसीने ७, आरएसपीने ३, भाजपने ३, आरजेडीने १, आरएमपीओआयने १, केरळ काँग्रेस (जेकब)ने १, कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष केरळ राज्य समितीने १ जागा जिंकली. याव्यतिरिक्त चार अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



तामिळनाडूत सर्व २३४ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. तमिलगा वेत्री कळघमने ९६ जागा जिंकल्या आणि ११ जागांवर आघाडी घेतली आहे. यामुळे तमिलगा वेत्री कळघमच्या नेतृत्वात तामिळनाडूत सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकने ५४ जागा जिंकल्या असून ६ जागांवर आघाडी घेतली आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमने ४४ जागा जिंकल्या आणि ३ जागांव आघाडी घेतली आहे. काँग्रेसने ५ जागा जिंकल्या आहेत. पीएमकेने २ जागा जिंकल्या आणि २ जागांवर आघाडी घेतली आहे. आययूएमएलने २ जागा जिंकल्या आहेत. सीपीआय, विदुथलाई चिरुथाईगल कच्ची, सीपीआयएम यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. भाजप, देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम आणि अम्मा मक्कल मुनेत्र कझागम यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या

Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले

Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा