Wednesday, May 6, 2026

Maharashtra Cabinet : दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल? दमदार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना नारळ मिळणार

Maharashtra Cabinet : दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल? दमदार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना नारळ मिळणार

- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजीची चर्चा

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांकडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात असून, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य फेरबदलाच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात, विशेषतः विद्यमान मंत्र्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. (Maharashtra Cabinet)

गेल्या अडीच वर्षांच्या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जात असून, या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. ज्या मंत्र्यांनी आपल्या खात्यात प्रभावी कामगिरी दाखवली नाही किंवा पक्षाच्या विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.(Maharashtra Cabinet)

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, कामगिरीत कमी पडणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले तरी त्यांना पूर्णपणे बाजूला न ठेवता पक्ष संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तळागाळापर्यंत पक्षाची ताकद वाढवणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे हा बदल काही नेत्यांसाठी धक्का असला, तरी काहींसाठी तो नवी संधी ठरू शकतो. या फेरबदलात नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता असून, सध्या राज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या काही नेत्यांना कॅबिनेट पदावर बढती मिळू शकते. याशिवाय, आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आमदारांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Maharashtra Cabinet)

कोणाला डच्चू मिळणार?

काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जाते. तसेच, वादग्रस्त ठरलेल्या किंवा स्थानिक स्तरावर जनमानसात नाराजी निर्माण करणाऱ्या मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.(Maharashtra Cabinet)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >