मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक अर्जांच्या छाननीनंतर सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडणुकीत दाखल झालेल्या १७ अर्जांपैकी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे अर्ज वैध ठरले असून, सूचक आणि अनुमोदक नसल्यामुळे चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २३६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ...
विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राजकीय पक्षांच्या चार उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले होते, तर चार जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत सर्वपक्षीय उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. याचबरोबर, विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध ठरला आहे. या पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता; परंतु त्यावर सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरला.
India and Japan Relations : अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील वाणिज्यदूत; मराठी शिकणार असल्याची माहिती
सातो हतामी यांनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठ तसेच सांस्कृतिक स्तरावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा
मुंबई : अलाहाबाद येथून हिंदी भाषेचे शिक्षण ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ मे रोजी संपली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ९ ही जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्यानुसार, भाजपच्या सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेस झिशान सिद्दिकी आणि उबाठाच्या अंबादास दानवे यांना बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.