पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज ४ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील हा थेट संघर्ष यंदा भारतीय राजकारणातील सर्वात मोठी लढाई मानली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. जवळपास १५ वर्षांनंतर बंगालमध्ये सत्तापालट झाली आहे. पुन्हा एकदा तिथे कमळ फुललं आहे. एकूण २९४ पैकी १९२ जागांवर भाजप निवडून आली आहे. त्यामुळे भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.
विक्रमी मतदान:
पुदुच्चेरी : पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या ३० जागा असलेल्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ८१ टक्के मतदान झाले. या राज्यात सध्या एन. रंगास्वामी ...
पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ या ३४ वर्षांच्या कालावधीत साम्यवादी विचारांच्या अर्थात कम्युनिस्ट विचारांच्या पक्षांचीच म्हणजेच डाव्यांची सत्ता होती. यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. या सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला तृणमूलचा पराभव करणे जमले नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये कमळ फुलवून दाखवले.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता तातडीने मार्गी ...
एकूण मतदान :
सुमारे ९२.९३% इतके ऐतिहासिक मतदान झाले आहे.जे स्वातंत्र्यानंतरचे राज्यातील सर्वोच्च मतदान ठरले आहे. पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान झाले.
तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत चुरशीचे बनले आहे. यंदा चार प्रमुख पक्षांमध्ये थेट ...
पश्चिम बंगालचा निकाल केवळ एका राज्याचा निकाल नसून तो आगामी राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारा आहे.
आसाममध्ये देखील भाजपाची विजयी हॅट्रिक :
मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.