West Bengal Election 2026 : दीदींचं राज्य गेलं; पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं!

पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज ४ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील हा थेट संघर्ष यंदा भारतीय राजकारणातील सर्वात मोठी लढाई मानली जात आहे.


पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. जवळपास १५ वर्षांनंतर बंगालमध्ये सत्तापालट झाली आहे. पुन्हा एकदा तिथे कमळ फुललं आहे. एकूण २९४ पैकी १९२ जागांवर भाजप निवडून आली आहे. त्यामुळे भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.



विक्रमी मतदान:


२०२६ ची ही निवडणूक दोन टप्प्यांत (२३ एप्रिल आणि २९ एप्रिल) पार पडली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बंगालने पुन्हा एकदा मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.



पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ या ३४ वर्षांच्या कालावधीत साम्यवादी विचारांच्या अर्थात कम्युनिस्ट विचारांच्या पक्षांचीच म्हणजेच डाव्यांची सत्ता होती. यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. या सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला तृणमूलचा पराभव करणे जमले नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये कमळ फुलवून दाखवले.



एकूण मतदान :


सुमारे ९२.९३% इतके ऐतिहासिक मतदान झाले आहे.जे स्वातंत्र्यानंतरचे राज्यातील सर्वोच्च मतदान ठरले आहे. पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान झाले.



पश्चिम बंगालचा निकाल केवळ एका राज्याचा निकाल नसून तो आगामी राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारा आहे.



आसाममध्ये देखील भाजपाची विजयी हॅट्रिक :


बंगालसोबतच आसाममध्ये देखील भाजपाने विजयाची हॅट्रिक केली आहे. आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आसामच्या १२६ जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पार्टी ७९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. बीओपीएफ १०, एजीपी ९ आणि एआययूडीएफ २ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत १२४ जागांचे आकडे हाती आले असून भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचे दिसत आहे.


मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.


Comments
Add Comment

Mumbai News : मस्जिद बंदर येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; ६ जणांची सुटका, २ जखमी

मुंबई: मुंबईतून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी दुपारी मुंबईतील अत्यंत दाट वस्तीच्या आणि

Dr. Mohan Bhagwat : तरुणांना सूचना देण्याऐवजी संवाद साधणे आवश्यक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; कुटुंबव्यवस्था बळकट करण्याचे आवाहन मुंबई (Mumbai ): आजच्या नवीन पिढीच्या जडणघडणीसाठी

Nashik : नाशिकरांनो काळजी घ्या ! शहरात डेंग्यूचे २२ रुग्ण

Nashik : नाशिक शहरात पावसाचे आगमन झाल्यानंतर आता नवी समस्या नाशिकरांना सतावत आहे. नाशिक शहरात आता डेंग्यूचा उद्रेक

Train Accident : उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला, मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील अमेठी परिसरात एक मोठा रेल्वे अपघात टळला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सिंदुरवा

Uttar Pradesh Crime : राहुल असल्याचे भासवून रचला प्रेमाचा सापळा; अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग आणि 'लव्ह जिहाद'चा गंभीर आरोप

हापूर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. एका

Ind VS Zim : झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत दिला भारताला दुहेरी धक्का ! अभिषेक आणि वैभव पॉवर प्ले संपण्यापूर्वी बाद

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळवला जात आहे. या