West Bengal Election 2026 : दीदींचं राज्य गेलं; पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं!

पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज ४ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील हा थेट संघर्ष यंदा भारतीय राजकारणातील सर्वात मोठी लढाई मानली जात आहे.


पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. जवळपास १५ वर्षांनंतर बंगालमध्ये सत्तापालट झाली आहे. पुन्हा एकदा तिथे कमळ फुललं आहे. एकूण २९४ पैकी १९२ जागांवर भाजप निवडून आली आहे. त्यामुळे भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.



विक्रमी मतदान:


२०२६ ची ही निवडणूक दोन टप्प्यांत (२३ एप्रिल आणि २९ एप्रिल) पार पडली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बंगालने पुन्हा एकदा मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.



पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ या ३४ वर्षांच्या कालावधीत साम्यवादी विचारांच्या अर्थात कम्युनिस्ट विचारांच्या पक्षांचीच म्हणजेच डाव्यांची सत्ता होती. यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. या सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला तृणमूलचा पराभव करणे जमले नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये कमळ फुलवून दाखवले.



एकूण मतदान :


सुमारे ९२.९३% इतके ऐतिहासिक मतदान झाले आहे.जे स्वातंत्र्यानंतरचे राज्यातील सर्वोच्च मतदान ठरले आहे. पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान झाले.



पश्चिम बंगालचा निकाल केवळ एका राज्याचा निकाल नसून तो आगामी राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारा आहे.



आसाममध्ये देखील भाजपाची विजयी हॅट्रिक :


बंगालसोबतच आसाममध्ये देखील भाजपाने विजयाची हॅट्रिक केली आहे. आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आसामच्या १२६ जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पार्टी ७९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. बीओपीएफ १०, एजीपी ९ आणि एआययूडीएफ २ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत १२४ जागांचे आकडे हाती आले असून भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचे दिसत आहे.


मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.


Comments
Add Comment

CUET-UG 2026 Exams : CUET-UG वेळापत्रकात बदल; २८ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG 2026)

NEET Paper Leak Case : 'गॉड' कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या फोनमधील नंबरमुळे वाढलं गूढ!

लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा

Beed Murder News : बीडमध्ये तरुणाची अमानुष हत्या; दोरीने बांधून बेदम मारहाण!

बीड : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड (Beed) जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर

Rakhi Sawant : राखी सावंत झाली भावूक; "आजपर्यंत मला खरं प्रेमच मिळालं नाही"

मुंबई : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' (Drama Queen) राखी सावंत (Rakhi Sawant) हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठे खुलासे केले आहेत.

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात मोठी अपडेट! दुसरा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ३-४ दिवसांत, AIIMS कसा तयार करणार अंतिम अहवाल?

भोपाळ : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात (Twisha Sharma Death Case) दररोज नवे खुलासे आणि प्रश्न समोर येत आहेत. आता सर्वांचे लक्ष

Raigad Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात; ७०० फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून ८ तरुणांचा मृत्यू

रायगड : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात