Tamil Nadu Kerala Election Results 2026 : तामिळनाडूत थलपथीची हवा तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता

तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत चुरशीचे बनले आहे. यंदा चार प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत झाल्यामुळे स्पष्ट अंदाज बांधणे कठीण ठरत आहे. मतमोजणीदरम्यान सतत बदलणारे आकडे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची करत आहेत. अशातच अभिनेता थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांच्या टीव्हीके पक्षाच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार एआयएडीएमके आघाडीवर असून काही जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर विजय यांचा टीव्हीके पक्ष झपाट्याने पुढे येताना दिसत आहे. डीएमके आणि सीपीआय देखील काही जागांवर स्पर्धेत टिकून आहेत. एकूण चित्र पाहता, टीव्हीके सुमारे ८३ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे, तर एआयएडीएमके ५८, डीएमके ३४, पीएमके ४, काँग्रेस ३ आणि बीजेपी १ जागेवर पुढे आहेत.



या निवडणुकीत विजय यांनी स्वतः तिरुचिरापल्ली ईस्ट आणि पेरंबूर या दोन मतदारसंघांतून उमेदवारी दिली आहे. तिरुचिरापल्ली ईस्टमध्ये ते डीएमकेच्या उमेदवारांवर आघाडीवर असून आतापर्यंत हजारो मते त्यांनी मिळवली आहेत. मात्र पेरंबूरमध्ये त्यांना मोठा धक्का बसताना दिसत असून ते मागे पडले आहेत. या मतदारसंघात अनेक उमेदवार त्यांच्यापुढे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


दरम्यान, या निवडणुकीत टीव्हीकेने स्वतःला ‘परिवर्तनाची ताकद’ म्हणून सादर केले होते. पारंपरिक द्रविड पक्षांपासून कंटाळलेल्या मतदारांना आकर्षित करण्यात आपण यशस्वी झाल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यामुळे या निकालांचा परिणाम केवळ सरकार स्थापनेपुरता मर्यादित राहणार नाही, तर राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल.



दरम्यान, केरळ (Kerala) मधील विधानसभा निवडणुकांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे एकाच टप्प्यात ७९.७ टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्री पिनारयी विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफकडून कडवे आव्हान मिळत आहे. १४० जागांच्या या विधानसभेत बहुमतासाठी ७१ जागांची गरज आहे.


सध्याच्या कलांनुसार, काँग्रेस सुमारे ६३ जागांवर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी २५, कम्युनिस्ट पार्टी ९, आययूएमएल २३ आणि केईसी ७ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केरळमध्येही सत्तांतर होणार की एलडीएफ पुन्हा सत्ता राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



एकूणच, तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांतील निवडणूक निकालांनी देशाच्या राजकीय पटलावर मोठी हालचाल निर्माण केली असून अंतिम निकालांसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Badlapur Shaken : केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरीवर एफडीएची धडक कारवाई

BADLAPUR: महाराष्ट्रातील बदलापूर शहरातून एक अतिशय संतापजनक आणि आरोग्याशी खेळणारा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. येथील

Water Cut Mumbai : येत्या मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण मुंबईतील काही भागांमध्ये तांत्रिक पाणीकपात

आधीच १० टक्के पाणीकपात, त्यात आणखी १५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Nashik Crime News : डायल ११२च्या सतर्कतेने दरोडा उधळला; ११ संशयित जेरबंद

Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Trimbakeshwar Police Station) हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात

MPSC Paper Leak : एमपीएससी' पेपरफुटीच्या आरोपांप्रकरणी आयोग पोलिसांत

- पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध