Tamil Nadu Kerala Election Results 2026 : तामिळनाडूत थलपथीची हवा तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता

तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत चुरशीचे बनले आहे. यंदा चार प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत झाल्यामुळे स्पष्ट अंदाज बांधणे कठीण ठरत आहे. मतमोजणीदरम्यान सतत बदलणारे आकडे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची करत आहेत. अशातच अभिनेता थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांच्या टीव्हीके पक्षाच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार एआयएडीएमके आघाडीवर असून काही जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर विजय यांचा टीव्हीके पक्ष झपाट्याने पुढे येताना दिसत आहे. डीएमके आणि सीपीआय देखील काही जागांवर स्पर्धेत टिकून आहेत. एकूण चित्र पाहता, टीव्हीके सुमारे ८३ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे, तर एआयएडीएमके ५८, डीएमके ३४, पीएमके ४, काँग्रेस ३ आणि बीजेपी १ जागेवर पुढे आहेत.



या निवडणुकीत विजय यांनी स्वतः तिरुचिरापल्ली ईस्ट आणि पेरंबूर या दोन मतदारसंघांतून उमेदवारी दिली आहे. तिरुचिरापल्ली ईस्टमध्ये ते डीएमकेच्या उमेदवारांवर आघाडीवर असून आतापर्यंत हजारो मते त्यांनी मिळवली आहेत. मात्र पेरंबूरमध्ये त्यांना मोठा धक्का बसताना दिसत असून ते मागे पडले आहेत. या मतदारसंघात अनेक उमेदवार त्यांच्यापुढे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


दरम्यान, या निवडणुकीत टीव्हीकेने स्वतःला ‘परिवर्तनाची ताकद’ म्हणून सादर केले होते. पारंपरिक द्रविड पक्षांपासून कंटाळलेल्या मतदारांना आकर्षित करण्यात आपण यशस्वी झाल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यामुळे या निकालांचा परिणाम केवळ सरकार स्थापनेपुरता मर्यादित राहणार नाही, तर राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल.



दरम्यान, केरळ (Kerala) मधील विधानसभा निवडणुकांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे एकाच टप्प्यात ७९.७ टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्री पिनारयी विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफकडून कडवे आव्हान मिळत आहे. १४० जागांच्या या विधानसभेत बहुमतासाठी ७१ जागांची गरज आहे.


सध्याच्या कलांनुसार, काँग्रेस सुमारे ६३ जागांवर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी २५, कम्युनिस्ट पार्टी ९, आययूएमएल २३ आणि केईसी ७ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केरळमध्येही सत्तांतर होणार की एलडीएफ पुन्हा सत्ता राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



एकूणच, तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांतील निवडणूक निकालांनी देशाच्या राजकीय पटलावर मोठी हालचाल निर्माण केली असून अंतिम निकालांसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime News : डायल ११२च्या सतर्कतेने दरोडा उधळला; ११ संशयित जेरबंद

Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Trimbakeshwar Police Station) हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात

MPSC Paper Leak : एमपीएससी' पेपरफुटीच्या आरोपांप्रकरणी आयोग पोलिसांत

- पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध

Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या गोळ्याला संपवले; आईकडून २० वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या

Nashik Kumbhmela : गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन; मार्चपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न; शेखर सिंहांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ,

Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका