Unorganized Workers : असंघटित कामगारांसाठीची ३९ आभासी मंडळे रद्द

मुंबई : असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी ३९ आभासी मंडळे (व्हर्च्युअल बोर्ड्स) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत शासन जारी केला. केंद्र सरकारच्या नवीन 'सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०' च्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रशासनातील दुप्पट काम टळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.



आधीच्या ६ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार, असंघटित कामगारांची नोंदणी, ओळख आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांचे ३९ क्षेत्रांमध्ये आणि ३४० प्रकारच्या व्यवसायांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. त्यानुसार, असंघटित कामगारांसाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र ३९ आभासी मंडळे स्थापन करण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी 'सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०' अधिसूचित केली आहे. या संहितेच्या कलम ६ (१) मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.



निर्णय का घेतला?


- नवीन संहितेच्या कलम १०९ (१) आणि (२) नुसार केंद्र व राज्य शासनामार्फत असंघटित कामगार, गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म बेस्ड वर्कर्स यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने जीवन आणि अपंगत्व विमा संरक्षण, आरोग्य व मातृत्व लाभ, वृद्धापकाळ संरक्षण, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), मुलांसाठी शैक्षणिक योजना, कौशल्य उन्नयन आणि गृहनिर्माण यांसारख्या अनेक लाभांचा समावेश आहे.



- या नवीन सामाजिक सुरक्षा संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्वीच्या रचनेतील तरतुदी, वर्गीकरणाची पद्धत व आभासी मंडळांची गरज तपासून पाहता, ६ जुलै २०२३ चा शासन निर्णय आणि त्याअंतर्गत तयार केलेली ३९ आभासी मंडळे आता रद्द करण्यात आली आहेत. तसेच, या आधीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे व अंमलबजावणी कार्यपद्धती यापुढे लागू राहणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील

Minister Shivendrasinhraje Bhosale : रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य; आंबेनळी घाटासह अपघातप्रवण मार्गांवर विशेष उपाययोजना

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती मुंबई : राज्यातील नागरिकांना

Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये 'मालवणी भाषा भवन' उभारणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : कोकणची समृद्ध संस्कृती

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा