Unorganized Workers : असंघटित कामगारांसाठीची ३९ आभासी मंडळे रद्द

मुंबई : असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी ३९ आभासी मंडळे (व्हर्च्युअल बोर्ड्स) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत शासन जारी केला. केंद्र सरकारच्या नवीन 'सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०' च्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रशासनातील दुप्पट काम टळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.



आधीच्या ६ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार, असंघटित कामगारांची नोंदणी, ओळख आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांचे ३९ क्षेत्रांमध्ये आणि ३४० प्रकारच्या व्यवसायांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. त्यानुसार, असंघटित कामगारांसाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र ३९ आभासी मंडळे स्थापन करण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी 'सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०' अधिसूचित केली आहे. या संहितेच्या कलम ६ (१) मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.



निर्णय का घेतला?


- नवीन संहितेच्या कलम १०९ (१) आणि (२) नुसार केंद्र व राज्य शासनामार्फत असंघटित कामगार, गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म बेस्ड वर्कर्स यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने जीवन आणि अपंगत्व विमा संरक्षण, आरोग्य व मातृत्व लाभ, वृद्धापकाळ संरक्षण, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), मुलांसाठी शैक्षणिक योजना, कौशल्य उन्नयन आणि गृहनिर्माण यांसारख्या अनेक लाभांचा समावेश आहे.



- या नवीन सामाजिक सुरक्षा संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्वीच्या रचनेतील तरतुदी, वर्गीकरणाची पद्धत व आभासी मंडळांची गरज तपासून पाहता, ६ जुलै २०२३ चा शासन निर्णय आणि त्याअंतर्गत तयार केलेली ३९ आभासी मंडळे आता रद्द करण्यात आली आहेत. तसेच, या आधीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे व अंमलबजावणी कार्यपद्धती यापुढे लागू राहणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९