Minister Ashish Shelar : 'उबाठा'ची साथ म्हणजे पराभवाची गॅरंटी

मंत्री आशिष शेलार यांचा टोला; तीन राज्यांतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांचे अभिनंदन


मुंबई : "विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच पुन्हा एकदा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधक हे केवळ बहाणेबाज असून, त्यांना स्वतःचा पराभव पचवता येत नाही", अशी खरमरीत टीका भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी केली. तसेच, ‘जो-जो उबाठा गटासोबत गेला, त्याचे राजकीय पानिपत झाले’, असा टोलाही त्यांनी लगावला.



भाजपच्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि आसाम या तीन राज्यांत मिळालेल्या विजयाबद्दल मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. पश्चिम बंगालमधील विजयाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर शेलार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये जर एसआयआरचा प्रभाव होता, तर केरळमधील निकालांना विरोधक काय म्हणणार? त्यांनी सर्वप्रथम आरशात पाहावे. विरोधक हे अत्यंत डरपोक आणि रडके आहेत. वस्तुस्थितीचा सामना करण्याची त्यांची तयारी नसते, त्यामुळेच ते पराभवाचे खापर सरकारी यंत्रणांवर फोडण्याचा प्रयत्न करतात. पराभवाचे खापर फोडण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे", असे ते म्हणाले.



'उबाठा'च्या संगतीचा परिणाम


‘उबाठा’ गटाच्या राजकीय भूमिकांवर निशाणा साधताना आशिष शेलार यांनी अनेक दाखले दिले. "तामिळनाडूत स्टॅलिन यांची बाजू घेणे असो, किंवा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना दिलेला पाठिंबा असो, जो-जो उबाठासोबत गेला त्याचा पराभव झाला हे स्पष्ट चित्र आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल हे महायुतीच्या विकासाच्या राजकारणावर जनतेने दिलेला कौल आहे," असे सांगत शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

Comments
Add Comment

Mumbai rain news : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला, सरकारी कार्यालये अर्धा दिवस सुरू राहणार

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे मार्ग ठप्प! दरड कोसळली, एक्स्प्रेस वेसह रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

मुंबई : मुंबई, पुणे आणि लोणावळा (Lonavala) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Expressway),

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; २४ तासांत पूर्व उपनगरात १६१.११ मिमी पावसाची नोंद

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) सोमवारी जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत शहरात

Mankhurd Incident : मुंबई हादरली! मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मानखुर्द (Mankhurd) परिसरात रविवारी (५ जुलै) रात्री एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना (Accident) घडली.

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील

School - College Holidays : मोठी बातमी! मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार