Minister Ashish Shelar : 'उबाठा'ची साथ म्हणजे पराभवाची गॅरंटी

मंत्री आशिष शेलार यांचा टोला; तीन राज्यांतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांचे अभिनंदन


मुंबई : "विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच पुन्हा एकदा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधक हे केवळ बहाणेबाज असून, त्यांना स्वतःचा पराभव पचवता येत नाही", अशी खरमरीत टीका भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी केली. तसेच, ‘जो-जो उबाठा गटासोबत गेला, त्याचे राजकीय पानिपत झाले’, असा टोलाही त्यांनी लगावला.



भाजपच्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि आसाम या तीन राज्यांत मिळालेल्या विजयाबद्दल मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. पश्चिम बंगालमधील विजयाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर शेलार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये जर एसआयआरचा प्रभाव होता, तर केरळमधील निकालांना विरोधक काय म्हणणार? त्यांनी सर्वप्रथम आरशात पाहावे. विरोधक हे अत्यंत डरपोक आणि रडके आहेत. वस्तुस्थितीचा सामना करण्याची त्यांची तयारी नसते, त्यामुळेच ते पराभवाचे खापर सरकारी यंत्रणांवर फोडण्याचा प्रयत्न करतात. पराभवाचे खापर फोडण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे", असे ते म्हणाले.



'उबाठा'च्या संगतीचा परिणाम


‘उबाठा’ गटाच्या राजकीय भूमिकांवर निशाणा साधताना आशिष शेलार यांनी अनेक दाखले दिले. "तामिळनाडूत स्टॅलिन यांची बाजू घेणे असो, किंवा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना दिलेला पाठिंबा असो, जो-जो उबाठासोबत गेला त्याचा पराभव झाला हे स्पष्ट चित्र आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल हे महायुतीच्या विकासाच्या राजकारणावर जनतेने दिलेला कौल आहे," असे सांगत शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

Comments
Add Comment

Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे

Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?

Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे.

Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन

मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात

Legal notice served to Amazon : महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबन प्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!

मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन

Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक

Navi Mumbai Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात रिक्षाचालकाची सव्वाकोटींची फसवणूक, तर मंदिरात पुजाऱ्याचाच चोरीचा प्रयत्न

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरात गुन्हेगारीच्या दोन वेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत ऑनलाइन गेमिंगच्या