Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच या योजनेतील पाणीपंपांचा वीज खर्च कमी करण्यासाठी प्रस्तावित १५०० केव्हीए क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून एका महिन्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


या संदर्भात मंत्रालयात मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. नायक, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्डचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



पर्यटन आणि नागरिकांसाठी महत्त्वाची योजना :


बैठकीत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास आणि स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नाबार्डच्या माध्यमातून या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागांनी वित्त विभागाच्या समन्वयाने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.



चिपी विमानतळाच्या विस्तारामुळे वाढणार पाण्याची गरज :


मंत्री पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी सांगितले की, वेंगुर्ला-चिपी हा सागरी किनारपट्टीचा भाग असल्याने गोड्या पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पातून पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाकडे ठराव आणि प्रस्ताव सादर केले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार, पर्यटन व्यवसाय आणि औद्योगिक प्रकल्प वाढल्यास पाण्याची मागणी आणखी वाढणार असल्याने ही योजना भविष्योन्मुख ठरणार आहे.



सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज खर्चात मोठी बचत :


तिलारी पाणीपुरवठा योजनेतील पाणीपंपांचा वाढता वीज खर्च लक्षात घेऊन १५०० केव्हीए क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही बैठकीत चर्चिला गेला. या प्रकल्पासाठी सुमारे १२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, तो उपलब्ध झाल्यास पाणीपुरवठा योजनेचा दीर्घकालीन वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. (Minister Gulabrao Patil)



७८.४६ कोटींच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरीची प्रतीक्षा :


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्पातून दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांना पाणीपुरवठा करण्याची योजना प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यातील दोडामार्ग ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून, आता वेंगुर्ला ते चिपी विमानतळ या दुसऱ्या टप्प्यासाठी ७८ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने ते नाबार्डच्या माध्यमातून राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.



४० गावांसह चिपी विमानतळाला होणार लाभ :


ही योजना पूर्ण झाल्यानंतर सागरी किनारपट्टीवरील सुमारे ४० महसुली गावे आणि चिपी विमानतळाला मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे या भागातील दीर्घकालीन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असून, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, उद्योग आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय पाणीपट्टीच्या माध्यमातून शासनालाही महसूल प्राप्त होणार असल्याने हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा

Nitesh Rane : मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

Devendra Fadnavis : राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन होणार

- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी उभारणार मुंबई : राज्यातील वाढती पाणीटंचाई दूर