Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने याबाबत प्रवाशांना माहिती देत, विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश, महिलांच्या डब्यात घुसखोरी आणि तिकिटांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात आता अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Central Railway New Rules)


या सुधारणांमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली असून, दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीला थेट न्यायालयात हजर केले जाणार आहे. काही प्रकरणांमध्ये कारावासाची तरतूदही कायम ठेवण्यात आली आहे. (Central Railway New Rules)



विनातिकीट प्रवास महागात पडणार :


रेल्वे कायद्याच्या कलम १३७ अंतर्गत वैध तिकीट किंवा पास नसताना फसवणुकीच्या उद्देशाने प्रवास करणाऱ्यांना आता भाड्यासह अतिरिक्त शुल्क (किमान ५०० रुपये) भरावे लागणार आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात जाईल. त्यानंतर न्यायालय दोषीला सहा महिन्यांपर्यंत कारावास, ५०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावू शकते. (Central Railway New Rules)



आरक्षित डब्यात प्रवेश केल्यास २ हजारांपर्यंत दंड :


कलम १५५ अंतर्गत आरक्षित डब्यात विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर आता २,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच अधिकृत प्रवाशाला डब्यात प्रवेश करण्यास अडथळा आणल्यास १,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. दंड न भरल्यास न्यायालय ३,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते आणि संबंधित व्यक्तीला डब्यातून बाहेर काढण्याचे आदेशही देऊ शकते. (Central Railway New Rules)



महिलांच्या डब्यात घुसल्यास ५ हजारांपर्यंत दंड :


महिलांसाठी राखीव डबा किंवा जागेत अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर आता २,५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. दंड न भरल्यास न्यायालय ५,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. संबंधित व्यक्तीची जागा रिकामी करून पास किंवा तिकीटही जप्त करण्यात येईल. मात्र, या कलमांतर्गत तृतीयपंथी व्यक्तींवर कारवाई केली जाणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Central Railway New Rules)



तिकिटांचा गैरवापर केल्यासही कठोर कारवाई :


कलम १४२ अंतर्गत तिकीट इतरांना हस्तांतरित करणे किंवा अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करणे यावरही कठोर कारवाई होणार आहे. अशा प्रकरणात तिकीट जप्त करून भाड्यासह अतिरिक्त शुल्क (किमान ५०० रुपये) भरावे लागेल. दंड न भरल्यास न्यायालय सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा २,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. (Central Railway New Rules)



अधिकृत अंतरापेक्षा पुढे प्रवास केल्यासही वाढीव दंड :


कलम १३८ नुसार तिकीटावरील अधिकृत अंतरापेक्षा पुढे प्रवास केल्यास आता भाड्यातील तफावत आणि अतिरिक्त शुल्क (किमान ५०० रुपये) भरावे लागेल. रक्कम न भरल्यास संबंधित व्यक्तीला न्यायालयासमोर हजर केले जाईल. आवश्यक रक्कम न भरल्यास १० दिवसांपासून एक महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. (Central Railway New Rules)



प्रवाशांना मध्य रेल्वेचे आवाहन :


मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना नेहमी वैध तिकीट किंवा पाससह प्रवास करण्याचे, आरक्षित जागांचा आदर करण्याचे, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश टाळण्याचे तसेच रेल्वे परिसरात फेरीवाला व्यवसाय, धूम्रपान आणि इतर बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, या सुधारित नियमांचा उद्देश प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे, गैरप्रकारांना आळा घालणे आणि सर्वांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध बनवणे हा आहे. (Central Railway New Rules)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा

Nitesh Rane : मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

Devendra Fadnavis : राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन होणार

- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी उभारणार मुंबई : राज्यातील वाढती पाणीटंचाई दूर

CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण; पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

मुंबई : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल