Sunetra Pawar : बारामतीचा विजय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित – सुनेत्रा पवार

मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेला ऐतिहासिक विजय हा अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी दिली. मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. तसेच, या विजयाचा जल्लोष न करता कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.


बारामतीकरांनी दाखवलेला हा विश्वास म्हणजे अजितदादांच्या विकासकामांवरील अढळ श्रद्धा असल्याचे त्या म्हणाल्या. "बारामतीकरांना अशी पोटनिवडणूक नकोच होती; परंतु परिस्थितीमुळे ती झाली. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दादांविषयीची आपली खरी भावना व्यक्त केली आहे," असे सांगत सुनेत्रा पवार भावूक झाल्या.



शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आजवर केलेल्या कामाची आणि सेवेची पोचपावती मतदारांनी आपल्या मतांतून दिली आहे. बारामती हे माझे कुटुंब असून, अजितदादांनी दाखवलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, शरद पवारांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याची घेतलेली भूमिकाही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.




ही नव्या बारामतीची सुरुवात


मतदारांनी दाखवलेल्या या प्रचंड विश्वासाने आपल्यावरील जबाबदारी वाढल्याचे सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, कुणीही मिरवणुका काढू नका किंवा गुलाल उधळू नका. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करूया. हा शेवट नाही, तर निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची सुरुवात आहे."

Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस - नागपूर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य