Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा सोडली. निरुपम यांच्या दिशेने बाटल्या फेकत आपली स्टाईल दाखवून दिली. या राड्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मनसेच्या ११ जणांना अटक केली होती. अटक केलेल्या सर्वांची २४ तासांच्या आत जामिनावर सुटका झाली आहे.


पोलिसांनी मनसेच्या ११ कार्यकर्त्यांच्या विरोधात दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जाणूनबुजून इजा करणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे अशा आरोपांतर्गत गुन्हा नोंदवला होता. पण प्रत्येकी सहा हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली.


राज्यात १ मे पासून रिक्षा, टॅक्सी आणि खासगी कॅब चालकांना मराठी भाषेतून संवाद साधणे सक्तीचे असेल. या संदर्भातला निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयावर शिवसेनेचेच माजी खासदार संजय निरुपम यांनी समतोल भूमिका घेतली आहे. परवाने रद्द करण्याऐवजी व्यावहारिक मराठीचे प्रदक्षिण द्या. ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना प्रशिक्षण द्या, एकदम परवाने रद्द करून अन्याय करू नका, असे निरुपम म्हणाले. पण निरुपम यांची भूमिका मनसेच्या पचनी पडलेली नाही.


दहिसरमध्ये निरुपम जेव्हा रिक्षाचालकांशी संवाद साधायला पोहोचले, तेव्हा मनसैनिकांनी त्यांच्या गाडीची हवा सोडत आणि बाटल्या फेकत आपली 'स्टाईल' दाखवून दिली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. अमित ठाकरे यांनी तर थेट इशारा दिलाय की, "मराठी सक्तीला विरोध कराल, तर मनसे स्टाईलने धडा शिकवू." यावर निरुपम यांनीही पलटवार करत मनसेची 'गुंडगिरी' खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिलाय.


मनसे आणि निरुपम यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मराठी येणं अनिवार्य आहेच, मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही'; असे सांगत नाव न घेता मनसेला दटावले आहे. या पार्श्वभूमीवर आता १ मे रोजी काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)