भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक नियम लागू केले आहेत. या नियमांचा थेट परिणाम सीमापार प्रवास करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या भारतीय नागरिकांवर होणार आहे.
पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथे विजय संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजप ४ मे रोजी राज्यात सरकार स्थापन करण्यास सज्ज ...
खरेदीसंदर्भातही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नेपाळमधून १०० नेपाळी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल आणल्यास कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे. या बदलांचा सर्वाधिक परिणाम सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. अनेक कुटुंबांचे सदस्य भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांत विखुरलेले असल्यामुळे त्यांचा दैनंदिन व्यवहार यावर अवलंबून आहे. दक्षिण नेपाळातील अनेक नागरिक स्वस्त वस्तू खरेदीसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जात असत; मात्र आता त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे, अन्यथा माल जप्त केला जात आहे.
भारत-अमेरिका व्यापार करारावरील सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...