West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये ४ मे रोजी भाजपच्या विजयाचा जल्लोष होईल - पंतप्रधान मोदी

पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथे विजय संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजप ४ मे रोजी राज्यात सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. तामिळनाडूमध्येही मतदान सुरू आहे. मी सर्व मतदारांना माझ्या शुभेच्छा देतो. मी सर्वांना विनंती करतो की, यावेळी मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करा."


पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी राजकारणात प्रवेश केल्यापासून, गेल्या ५० वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात हिंसाचार अगदी कमी झाला आहे, असे मी म्हणू शकतो. अन्यथा, दर आठवड्याला कोणीतरी गळफास घेत असे आणि आत्महत्या केल्याचे जाहीर केले जात असे. ही एक प्रकारची गुंडगिरीच होती. बंगालमध्ये लोकशाहीचा मान पुन्हा एकदा प्रस्थापित केल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यात निवडणूक आयोगाला मिळालेले यश ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यावेळी शांततापूर्ण निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी जबाबदारीने आपली भूमिका बजावणाऱ्या येथील सरकारी कर्मचाऱ्यांचेही मी अभिनंदन करतो."



पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज कृष्णनगरमध्ये आपल्याला तो आत्मविश्वास दिसतोय, ज्याने भीतीवर विश्वासाचा विजय मिळवला आहे. हा उत्साह, ही उत्कटता, हा जोश विश्वासाचाच परिणाम आहे. भीती दूर होत आहे, विश्वास पुढे जात आहे. ज्यांचा आवाज वर्षानुवर्षे दाबला गेला होता, ते आता एकसुरात बोलत आहेत. एकामागून एक गाव, एकामागून एक गल्ली, स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, सर्वजण म्हणत आहेत, 'पल्टों दरकर चाही भाजप सरकार' (जुने सरकार जायलाच हवे, भाजपचे सरकार स्थापन व्हायलाच हवे)."


पंतप्रधान म्हणाले की, बंगालमध्ये टीएमसीचे आमदार, मंत्री, स्थानिक नेते आणि त्यांच्या सिंडिकेटविरोधात इतका संताप आहे की, अनेक जिल्ह्यांमध्ये टीएमसी आपले खातेसुद्धा उघडू शकणार नाही.


निवडणुकीच्या निकालाचा दिवस असलेल्या ४ मे बाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्ही भाजप-एनडीएच्या विजयाचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकवलाच पाहिजे. ४ मे रोजी बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष होईल, मिठाई वाटली जाईल आणि झालमुरीसुद्धा वाटली जाईल. झालमुरीनेही काही लोकांना मोठा धक्का दिला आहे. मी झालमुरी खाल्ली... पण टीएमसीला मोठा फटका बसला आहे."



पंतप्रधान मोदी म्हणाले, "१५ वर्षांपूर्वी लोकांनी डाव्यांविरुद्ध आवाज उठवला होता. आज बंगालची जनता प्रत्येक गल्लीबोळात आणि वस्तीत तृणमूलच्या जंगलराजविरोधात आवाज उठवत आहे. ही निवडणूक ना मोदी लढत आहेत, ना माझे सहकारी. यावेळी बंगालची जनता निवडणूक लढत आहे. निवडणुकीचे नेतृत्व बंगालच्या जनतेच्या हातात आहे. मी जिथे कुठे जातो, तिथे लोक एकच गोष्ट सांगतात: आता पुरे झाले."

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी