West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये ४ मे रोजी भाजपच्या विजयाचा जल्लोष होईल - पंतप्रधान मोदी

पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथे विजय संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजप ४ मे रोजी राज्यात सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. तामिळनाडूमध्येही मतदान सुरू आहे. मी सर्व मतदारांना माझ्या शुभेच्छा देतो. मी सर्वांना विनंती करतो की, यावेळी मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करा."


पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी राजकारणात प्रवेश केल्यापासून, गेल्या ५० वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात हिंसाचार अगदी कमी झाला आहे, असे मी म्हणू शकतो. अन्यथा, दर आठवड्याला कोणीतरी गळफास घेत असे आणि आत्महत्या केल्याचे जाहीर केले जात असे. ही एक प्रकारची गुंडगिरीच होती. बंगालमध्ये लोकशाहीचा मान पुन्हा एकदा प्रस्थापित केल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यात निवडणूक आयोगाला मिळालेले यश ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यावेळी शांततापूर्ण निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी जबाबदारीने आपली भूमिका बजावणाऱ्या येथील सरकारी कर्मचाऱ्यांचेही मी अभिनंदन करतो."



पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज कृष्णनगरमध्ये आपल्याला तो आत्मविश्वास दिसतोय, ज्याने भीतीवर विश्वासाचा विजय मिळवला आहे. हा उत्साह, ही उत्कटता, हा जोश विश्वासाचाच परिणाम आहे. भीती दूर होत आहे, विश्वास पुढे जात आहे. ज्यांचा आवाज वर्षानुवर्षे दाबला गेला होता, ते आता एकसुरात बोलत आहेत. एकामागून एक गाव, एकामागून एक गल्ली, स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, सर्वजण म्हणत आहेत, 'पल्टों दरकर चाही भाजप सरकार' (जुने सरकार जायलाच हवे, भाजपचे सरकार स्थापन व्हायलाच हवे)."


पंतप्रधान म्हणाले की, बंगालमध्ये टीएमसीचे आमदार, मंत्री, स्थानिक नेते आणि त्यांच्या सिंडिकेटविरोधात इतका संताप आहे की, अनेक जिल्ह्यांमध्ये टीएमसी आपले खातेसुद्धा उघडू शकणार नाही.


निवडणुकीच्या निकालाचा दिवस असलेल्या ४ मे बाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्ही भाजप-एनडीएच्या विजयाचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकवलाच पाहिजे. ४ मे रोजी बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष होईल, मिठाई वाटली जाईल आणि झालमुरीसुद्धा वाटली जाईल. झालमुरीनेही काही लोकांना मोठा धक्का दिला आहे. मी झालमुरी खाल्ली... पण टीएमसीला मोठा फटका बसला आहे."



पंतप्रधान मोदी म्हणाले, "१५ वर्षांपूर्वी लोकांनी डाव्यांविरुद्ध आवाज उठवला होता. आज बंगालची जनता प्रत्येक गल्लीबोळात आणि वस्तीत तृणमूलच्या जंगलराजविरोधात आवाज उठवत आहे. ही निवडणूक ना मोदी लढत आहेत, ना माझे सहकारी. यावेळी बंगालची जनता निवडणूक लढत आहे. निवडणुकीचे नेतृत्व बंगालच्या जनतेच्या हातात आहे. मी जिथे कुठे जातो, तिथे लोक एकच गोष्ट सांगतात: आता पुरे झाले."

Comments
Add Comment

Team India New Coach: अफगाणिस्तान दौऱ्यापूरर्वी टीम इंडियात मोठे बदल; टीम इंडियाला मिळाला नवा फिरकी गुरू !

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळा द्वारा (बीसीसीआय) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी

Dr.BabaSaheb Ambedkar : माता रमाबाई नगरातील आंबेडकर पुतळा परिसर होणार आकर्षक..

आठवडाभरात आराखडा सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश... मुंबई : घटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर

Nashik TCS Case : नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपपत्रात जलीलचं नाव

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणात दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात ‘एमआयएम’चे माजी खासदार

Terrorist Hufaiza : दाऊद-ISI मॉड्यूलवर मोठा घाव; मुंबईतून दहशतवादी हुफैजा अटकेत, दहशतवादी जाळ्याचा तपास तीव्र

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने

दिल्लीतील हॉटेलमध्ये भीषण आग; अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग (Massive Fire)

Nashik : पहिल्याच पावसात मोठी दुर्घटना ! कपालेश्वर मंदिरासमोरील वाड्याची भिंत कोसळून एक भाविक गंभीर जखमी

नाशिक : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात कपालेश्वर मंदिर परिसरातील 'बिवलकर वाडा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या