Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना आता ‘व्यावहारिक मराठी’चे धडे

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सामोपचाराची भूमिका घेतली आहे. मराठी न समजणाऱ्या किंवा बोलता न येणाऱ्या परप्रांतीय चालकांना आता भाषेचे रीतसर प्रशिक्षण दिले जाणार असून, १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या विशेष उपक्रमाचा श्रीगणेश होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी या महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली.


राज्यात रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांशी संवाद सुलभ व्हावा, या उद्देशाने परिवहन विभागाने चालकांना किमान ‘वर्किंग नॉलेज’ (व्यावहारिक ज्ञान) असणे आवश्यक ठरवले आहे. यासाठी मोटार वाहन नियमातील तरतुदींमध्ये बदल करून परवाना (लायसन्स), बॅज आणि परमिटच्या नूतनीकरणासाठी मराठी ज्ञानाची अट लागू केली जाणार आहे. मात्र, ही सक्ती करतानाच चालकांवर भाषेचा अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी सोपी वाक्ये शिकविण्यावर भर दिला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.


या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘कोकण मराठी साहित्य संघ’ (कोमसाप) आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ या नामांकित संस्थांची मदत घेतली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात या संस्थांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या चालकांना प्रमाणपत्र दिले जाईल, जे भविष्यात परमिट आणि लायसन्स प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी १०० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, त्यात अभ्यासक्रम आणि प्रश्नावली तयार केली जाईल.


रोजगारावर गदा आणण्याचा हेतू नाही - प्रताप सरनाईक


परिवहन भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, मराठी भाषा विभागाचे उपसचिव नामदेव भोसले यांच्यासह डॉ. शामकांत देवरे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे आणि अरुण म्हात्रे यांसारखे भाषातज्ज्ञ उपस्थित होते. "राज्यात व्यवसाय करणाऱ्यांना येथील लोकभाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कोणाच्याही रोजगारावर गदा आणण्याचा आमचा हेतू नाही, मात्र सक्तीपेक्षा जनजागृती आणि सुलभ शिक्षणाद्वारे हा बदल घडवून आणला जाईल," अशी भूमिका सरनाईक यांनी यावेळी मांडली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असला, तरी चालक संघटना यावर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध