Nida Khan : निदा खान TCS मधून निलंबित, अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २७ एप्रिलला

नाशिक : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला टीसीएसने सेवेतून निलंबित केले आहे. पोलीस निदाला शोधत आहे. निदाच्या घरच्यांकडे तिचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निदाने नाशिक सत्र न्यायालयात (नाशिक सेशन्स कोर्ट) अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. निदाच्या अर्जावर सत्र न्यायालयात सोमवारी २० एप्रिल रोजी सुनावणी झाली पण निर्णय झाला नाही. पुढील सुनावणी २७ एप्रिलच्या सोमवारी होणार आहे.


न्यायालयात सुनावणी प्रलंबित असली तरी टीसीएसने निदा खानला सेवेतून निलंबित केले आहे आणि तिचे कंपनीशी संबंधित सर्व अॅक्सेस काढून घेतले आहेत. पोलिसांनी निदाचा शोध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


सोमवारी २० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी निदाच्या वकिलाने आणि सरकारी वकिलाने आपापली बाजू मांडली तसेच युक्तिवादाचे आणखी मुद्दे मांडण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने पुढील सुनावणी २७ एप्रिलच्या सोमवारी ठेवली आहे.


निदा खान टीसीएसमध्ये प्रोसेस असोसिएट पदावर कार्यरत होती, तिला निलंबित करताना कंपनीने टीसीएसशी संबंधित असलेले तिचे सर्व अॅक्सेस काढून घेतले आहेत. कंपनीशी संबंधित ज्या वस्तू निदाकडे आहेत त्या सर्व तिच्याकडून परत मागण्यात आल्या आहेत. तसेच तिला पुढील आदेशापर्यंत कंपनीसाठी काम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा निलंबनाचा आदेश टीसीएसच्या पुणे, नाशिक, गोवा ब्रँचचे एचआर प्रमुख शेखर कांबळे यांनी काढला आहे.


टीसीएस नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एक गुन्हा पुरुष कर्मचाऱ्याने तर आठ गुन्हे हे महिला कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक छळ तसेच विशिष्ट पदार्थ खाणे, विशिष्ट पोशाख करणे यासाठी वरिष्ठांनी दबाव टाकणे, धर्मांतराची सक्ती, अश्लील आणि आक्षेपार्ह वर्तन, अत्याचार अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद टीसीएस प्रकरणी झाली आहे.

Comments
Add Comment

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर

राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने

Kolhapur : कोल्हापूरमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणार

मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Education : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जून पासून नवीन अभ्यासक्रम

नागपूर : नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर