Pandya Brothers : पंड्या ब्रदर्समध्ये फूट की संघासाठी एकनिष्ठता ? त्या दिवशी मैदानात नक्की घडल काय?

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर १२ एप्रिल रोजी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे मुंबईची पराभवाची हॅट्रिक झाली आहे. हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आरसीबीच्या फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. आणि मुंबई हा सामना १८ धावांनी हरले.



पण चर्चा हार्दिक आणि कृणालची


मैदानात अशी काही घटना घडली की ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि अनेक प्रश्न उभे राहिले. क्रिकेटच्या मैदानात संघ भिडतात पण इथे दोन भाऊ एकमेकांशी भिडताना दिसले. या दोन भावांतील स्पर्धा ही केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नव्हती तर त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या नात्यातील तणाव हा स्पष्टपणे दिसून येत होता. कृणाल पंड्या आणि हार्दिक यांच्यात काहीतरी बिनसलं आहे अशी चर्चा अनेक दिवसांपासून चालू होती, पण मैदानावरची ती घटना पाहून त्या अफवांना आता चांगलीच हवा मिळाली आहे.



मैदानात नक्की घडलं काय?




बॉलिंग करताना कृणालने हार्दिकला बाउन्सर टाकत त्याचे स्वागत केले. त्यावर हार्दिक थंड नजरेने प्रतिसाद दिल्याचे सर्वांच्या नजरेस पडले. जेव्हा आरसीबीच्या जेकब डॅफीने हार्दिकची विकेत घेतली तेव्हा कृणाल पंड्या याने मोठ्याने आणि अतिशय आक्रमकपणे जल्लोष केला, त्यामुळे चाहते हैराण झाले. हे प्रकरण इतक्यातच न थांबता मॅच संपल्यावर जेव्हा सगळे खेळाडू एकमेकांना हात मिळवतात करतात, तेव्हा या दोन भावांनी एकमेकांना हात देखील मिळवले नाहीत. त्यामुळे यांच्यात काहीतरी बिघडल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे, हे दोघे भाऊ भले वेगळ्या संघासाठी खेळत असले तरी मैदानात नेहमीच मज्जा मस्करी करताना आपल्याला दिसतात पण यावेळी त्यांच्यात जे झालं, त्यावरून खरंच त्यांच्यात बिनसलंय की फळत मॅच पुरता हा आक्रमकपणा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.




Comments
Add Comment

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला