Pratap Sarnaik : स्कूल बसचे भाडे आता सरकार ठरवणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, पालकांना अलर्ट जाणार


मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. शालेय बसच्या भाडेवाढीला चाप लावत आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण स्कूल बसचे भाडे निश्चित करणार असून, पालकांकडून एकरकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६’ या सुधारित नियमावलीचा मसुदा गृह विभागाने प्रसिद्ध केला असून, यावर १५ दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.


अनेक शाळा आणि बस कंत्राटदार पालकांकडून वर्षभराचे भाडे आगाऊ घेतात. नव्या नियमानुसार आता केवळ मासिक भाडेच आकारता येईल. तसेच, प्रत्येक शाळेत ‘स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी’ स्थापन करणे अनिवार्य असून, ही समिती भाडे आणि तक्रारींचे निवारण करेल. या समितीला दर तीन महिन्यांनी आपला अहवाल सादर करावा लागेल.



विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता केवळ सीसीटीव्ही पुरेसे नसून, प्रत्येक बस आणि व्हॅनमध्ये जीपीएस आधारित ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि पॅनिक बटण बसवणे बंधनकारक असेल. वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, विद्यार्थ्यांची डिजिटल उपस्थिती आणि स्वयंचलित अलर्ट पालकांना मिळणार आहेत. बसेसमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा आणि सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले आहेत.

महिला परिचारिकांची सक्ती


- पूर्व-प्राथमिक ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान प्रत्येक बसमध्ये महिला परिचारिका किंवा नियुक्त कर्मचारी असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची बसमध्ये चढताना आणि उतरताना वेळेसह नोंद ठेवावी लागणार आहे. तसेच, विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) मुलांसाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि सुलभ प्रवेश व्यवस्थेची तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे.
- त्याशिवाय चालक आणि वाहकांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम लागू झाल्यानंतर तीन महिन्यांत बदल न केल्यास वाहनाचा परवाना थेट रद्द होणार आहे. शिक्षण आणि परिवहन विभाग संयुक्तपणे बसेसची तपासणी करून जिल्हा समितीला अहवाल देणार आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त