Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस (Coimbatore–Jaipur AC Express) १३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे. विशेष म्हणजे या गाडीला आता धरणगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील (Dharangaon Station) प्रवासी अनेक वर्षांपासून या थांब्याची मागणी करत होते. प्रवासी मंडळाने सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे (Railway Administration) पाठपुरावा केला. प्रवाशांची वाढती संख्या, राजस्थानकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांची गरज तसेच दक्षिण भारताशी वाढणारा संपर्क लक्षात घेऊन ही मागणी सातत्याने लावून धरली होती. तसेच खासदार स्मिता वाघ (MP Smita Wagh) यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे (Ministry of Railways) हा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत धरणगावला अधिकृत थांबा मंजूर केला.
Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू ...
धरणगाव थांब्याचे वेळापत्रक
गाडी क्रमांक ०६१८१ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस (Coimbatore–Jaipur AC Express) प्रत्येक शुक्रवारी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावरून जयपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. तर गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस प्रत्येक सोमवारी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावर येऊन कोयंबतूरच्या दिशेने रवाना होईल. दोन्ही बाजूने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेता प्रवाशांना राजस्थानसह दक्षिण भारताकडे जाणे सोयीचे ठरणार आहे.
मुंबई : मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल नगर येथे एकाच कुटुंबातील भावांमध्ये ...
राजस्थानकडे जाण्यासाठी थेट सुविधा
धरणगाव स्थानकावरून (Dharangaon Station) जयपूरसह राजस्थानातील इतर शहरांकडे जाण्यासाठी उपलब्ध असणारी ही एकमेव थेट रेल्वे सेवा आहे. त्यामुळे प्रवाशांना जळगाव, भुसावळ किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही. राजस्थानमध्ये व्यवसाय, शिक्षण, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने थोडेफार चढउतार सुरु होते. मात्र, बुधवारी ...
त्याचप्रमाणे कोयंबतूरमार्गे तामिळनाडू व दक्षिण भारतातील इतर शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही रेल्वे सोयीची ठरणार आहे. विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने मानले आहेत. तसेच या थांब्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या खासदार स्मिता वाघ यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. प्रवासी मंडळाचे अध्यक्ष तथा डीआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी यांनी नागरिकांनी या रेल्वे सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.