Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मंगळवारी रात्री हा अपघात घडला असून या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत काही काळ वाहतूक रोखून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. (Dhule Accident News )





नेमकं प्रकरण काय ?


मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिरपूर-चोपडा मार्गावर (Shirpur-Chopda Road) दोन जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. भाटपुरा (ता. शिरपूर) येथील चेतन योगेश गुजर (वय २३) आणि कल्पेश नितीन गुजर (वय २५) हे दुचाकीवरून घरी परतत असताना जळगावहून शिरपूरकडे येणाऱ्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (Dhule Accident News )


ही धडक इतकी भीषण होती की, बसने दुचाकीसह दोघांना सुमारे १० ते १५ फूट फरपटत नेले. त्यामुळे दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र (Highway Police Station) आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे (Shirpur City Police Station) पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची समजूत काढून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचा पुढील तपास थाळनेर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद