Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकी संदर्भात आपली अधिकृत भूमिका जाहीर केली असून, त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर हाके यांनी हा पवित्रा घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, "बारामतीमध्ये सध्या सहानुभूतीची लाट आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून मला भटक्या विमुक्त जाती-जमातींचे आणि ओबीसींचे काही प्रलंबित प्रश्न आक्रमकपणे मांडायचे होते. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत सदस्य नसून, केवळ एक आंदोलक म्हणून समाजाचा आवाज उठवणे ही माझी प्राथमिकता आहे." हाके यांच्या भूमिकेमुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी हाके यांच्याशी संवाद साधून त्यांना निवडणूक न लढवण्याची विनंती केली. तसेच दत्तात्रय भरणे, उदय सामंत आणि धनंजय मुंडे यांसारख्या दिग्गज नेत्यांनीही हाके यांना फोन करून सकारात्मक चर्चा केली.



माघारीनंतरही लक्ष्मण हाकेंचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर


निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतरही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रलंबित प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य केले आहे. "माझी लढाई पदासाठी नसून समाजाच्या हक्कासाठी आहे. गेल्या वर्षभरात अनेक प्रश्न मांडूनही ते मार्गी लागलेले नाहीत, ही खेदाची बाब आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. लक्ष्मण हाके यांनी विशेषतः राज्य सरकारने घोषित केलेल्या १८ महामंडळांच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. "निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ओबीसी आणि भटक्या समाजासाठी १८ महामंडळांची घोषणा केली खरी, पण आजतागायत त्यांना ना अध्यक्ष मिळाले आहेत ना हक्काचे कार्यालय. या केवळ कागदी घोषणाच राहिल्या आहेत," अशी टीका हाकेंनी केली. अजित पवारांच्या (दादांच्या) कार्यपद्धतीवर आणि धोरणांवर आपण आक्रमकपणे भूमिका मांडत असल्याचे सांगतानाच, त्यांनी स्पष्ट केले की संघर्ष करताना कधीही परिणामांची भीती बाळगली नाही. "निवडणूक लढणार नसलो तरी, आमची चळवळ आणि ओबीसींच्या मागण्यांसाठीचा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहील, अनेक मुद्यांवर आक्रमकपणे भूमिका मांडली. या सर्व गोष्टी असताना सुनेत्राताईंचा फोन आला. एवढी सगळी मंडळी कॉल करत असताना आपण विचार केला पाहिजे. म्हणून माघार घेतली” असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. ते बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार नाहीत.



कर नाही त्याला डर कशाला


निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का? या प्रश्नाला लक्ष्मण हाके यांनी अत्यंत सडेतोडपणे उत्तर दिले आहे. "जेव्हा एखादा माणूस प्रामाणिक हेतूने काम करतो, तेव्हा त्याला कशाचीही भीती नसते. 'कर नाही त्याला डर कशाला' या उक्तीप्रमाणे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे," असे हाके यांनी स्पष्ट केले.



निवडणूक १० दिवसांची, पण लढा...


बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी, आपल्या मूळ भूमिकेवर आपण आजही ठाम असल्याचे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले आहे. "निवडणूक ही केवळ १०-१५ दिवसांची प्रक्रिया आहे, परंतु समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मोठा कालावधी समोर आहे. या निवडणुकीनंतर मी शांत बसणार नाही," असे हाके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नेत्यांसमोर मांडणार प्रश्नांचा पाढा आतापर्यंतचा अनुभव फारसा समाधानकारक नसल्याची कबुली देत हाके म्हणाले की, काही आंदोलनांना यश आले असले तरी अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य