Navnath Ban : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा जनतेनेच शाहिस्तेखान केला

- भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर प्रहार


मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची बोटे छाटण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतच केले असल्याचा घणाघात करत त्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचे काम जनतेने केले आहे. कधीकाळी राज्यातील मोठा पक्ष असलेल्या उबाठाने आपल्या पक्षाचा आत्मा सोडला असून ती कॉंग्रेसच्या वळचणीला गेल्याचा प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते.


राजकारणातील संवेदनशीलतेबाबत बोलायचे तर या संवेदनशीलतेला नख लावण्याचे काम उबाठाने केले आहे. नारायण राणे, कंगना राणावत आणि मोहित कुंबोज यांचे घर पाडणे, व्यंगचित्र काढले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे, ही असंवेदनशीलतेचीच उदाहरणे आहेत. महाविकास आघाडीच्या राज्यातच केतकी चितळे तसेच पत्रकारांचा आवाज दडपण्यासाठी त्यांनाही अटक झाली तेव्हा संवेदनशीलतेवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांनी कधीच गमावला आहे, अशी टीका बन यांनी केली.


बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यावी याबाबत उबाठा आणि संजय राऊत यांच्यात संभ्रम आहे. संजय राऊत यांनी आतापासूनच कॉंग्रेसची तळी उचलण्याचे धोरण अवलंबले आहे. आताच ते कॉंग्रेसचा उदो उदो करत आहेत. कारण आणखी काही वर्षांनी आपल्याला कॉंग्रेसमध्येच जायचे आहे हे त्यांनी ठरवलेलेच आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात अशा नेत्यांपेक्षा आपल्यालाच कॉंग्रेस अधिक कळते असे दाखवून संजय राऊत यांना राहुल गांधी यांना प्रभावित करायचे असल्याचे नवनाथ बन यांनी सुनावले.


भाजपाने नाती जपली नाहीत असा आरोप संजय राऊत करत आहेत. मात्र ज्यांनी स्वत:च्या भावाचे नाते जपले नाही त्यांनी भाजपाबद्दल बोलू नये. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. मात्र उबाठाने अमित ठाकरे यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला तेव्हा त्यांना नाती आणि परंपरा आठवली नाही का, असा सवाल बन यांनी केला.


महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी रिक्षा आहे, जिची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशांना जातात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमध्ये यातील घटक पक्षांचे एकमत होत नाही. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत. गटबाजीचे राजकारण होत महाविकास आघाडी गटबाजीत गटांगळ्या खात असल्याची सणसणीत टीका नवनाथ बन यांनी केली.

Comments
Add Comment

BJP Foundation Day : भाजप स्थापना दिनाच्या पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि योगींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले ...

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे