Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुक यांसारखे गुन्हे देखील आता समोर येत आहे. अशातच आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


अशोक खरातवर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहीजे. यावर लक्ष द्यायला पाहीजे. आपल्याकडे पुन्हा अशा घटना घडल्याच नाही पाहीजे, असं गौतमी पाटील म्हणाली. तसेच यासाठी कडक कारवाई व्हायला हवी, म्हणजे देशात असे प्रकार कुठे घडणार नाहीत, असंही गौतमीने सांगितले.


अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून अशोक खरातसह समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. २०२१ साली समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत उघडली १०० खाती उघडून या खात्यातून आतापर्यंत ६० कोटीहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे.


या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी पोलीसांकडून १९ खातेदारांची चौकशी सुरू असताना हा घोटाळा समोर आला आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाच्या तपासात खरातच्या अनेक मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली.


अनेकांना जाळ्यात फसवून भोंदूबाबा अशोक खरातनं मोठी संपत्ती जमवल्याचं तपासात समोर आलं आहे. यामुळे भोंदूबाबा अशोक खरात आता ईडीच्याही निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणाचा तपास आता ईडी करणार असून यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


भोंदू बाबा अशोक खरातनं केवळ अंधश्रद्धेच्या नावाखालीच नव्हे, तर 'हवाला' रॅकेटच्या माध्यमानंही फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता, अशी माहिती असून अशोक खरातने मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे २५ हजार रुपये एवढे होते. वर्षभर ही रूम अशोक खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान रूममधून कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांची देवाण-घेवाण आणि आखणी केली जात असल्याचं या तपासात समोर येत असून भोंदूबाबा अशोक खरातबाबत अनेक नवनवीन खुलासे उघड होत आहेत.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे