BJP Foundation Day : भाजप स्थापना दिनाच्या पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि योगींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले ...

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या समर्पणभावना आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचा गौरव केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, भाजपाने नेहमीच ‘इंडिया फर्स्ट’ या तत्त्वावर काम करत समाजसेवेत अग्रणी भूमिका बजावली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ सेवाभाव, अथक परिश्रम आणि सुशासनासाठीच्या बांधिलकीचे कौतुक केले. अनेक दशकांपासून असंख्य कार्यकर्त्यांच्या त्याग, सेवा आणि दृढ संकल्पामुळे पक्ष अधिक मजबूत झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. जनकल्याणाला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची पक्षाची परंपरा आजही कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.





केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ‘नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट’ या मंत्राचा पुनरुच्चार करत कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. सीमा व अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, विकासाचे नवे मानदंड निर्माण करणे आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणे या क्षेत्रांत भाजपाने उल्लेखनीय कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऋषी दधीची यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याचा संदेश त्यांनी दिला.





स्थापना दिनानिमित्त राष्ट्रसेवेसाठी कार्य करणाऱ्या महान आत्म्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून एक सजीव वैचारिक परंपरा असल्याचे सांगितले. ‘अंत्योदय ते राष्ट्रोदय’ या ध्येयाने प्रेरित होऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. “भाजपाचे राष्ट्रवादी कुटुंब आज एका विशाल वटवृक्षाप्रमाणे उभे आहे, जे सेवा, मूल्ये आणि समर्पणाच्या बळावर देशवासियांच्या आकांक्षांना बळ देत आहे,” असे ते म्हणाले.





भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध, नीट पेपर लीक प्रकरणात केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयाला महाराष्ट्राचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेपर लीक रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक

Pandharpur : पंढरपूरमध्ये पोहोचले १५ लाख भाविक, संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल; चंद्रभागेला भक्तिचा महापूर

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठुरायाचे रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये १५ लाख भाविक पोहोचले आहेत. हा आकडा

Narendra Modi : नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र

ISSF World Cup : आयएसएसएफ विश्वचषक: सैन्यमने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पटकावले रौप्यपदक

नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने

Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे