उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर


मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मंगळवार, ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मेट्रो मार्गिका ९ आणि २-बी च्या पहिल्या टप्प्यांचे उद्घाटन, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ आणि अत्याधुनिक 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचे ई-भूमिपूजन अशा 'विकासाच्या चतुःसूत्री'चा समावेश आहे.


या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असून, मुंबईकरांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने' 'प्रवास क्रांती'चा ठरणार आहे. प्रकल्पांची व्याप्ती मोठी असल्याने कार्यक्रमाचे आयोजन तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. सोहळ्याची सुरुवात सकाळी १० वाजता दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथून होईल. तेथे मेट्रो मार्गिका ९ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाईल. त्यानंतर, सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री ठाण्यातील मानपाडा येथे पोहोचतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या आणि ठाणे-बोरिवलीतील अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी येथे 'टीबीएम' (टनेल बोअरिंग मशीन) लॉन्च करण्यात येणार आहे.


कार्यक्रमाचा समारोप दुपारी १२.३० वाजता चेंबूरमधील डायमंड गार्डन मेट्रो स्थानक येथे होईल. यावेळी मेट्रो लाईन २-बी च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यासोबतच, मुंबईत पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री करतील. सार्वजनिक वाहतुकीला तंत्रज्ञानाची जोड देऊन मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.



फायदा काय होणार?


मेट्रो मार्गिका ९ आणि २-बी मुळे उपनगरातील प्रवाशांचा लोकलवरील ताण कमी होणार असून, पश्चिम आणि पूर्व उपनगरे मेट्रोने अधिक सक्षमपणे जोडली जाणार आहेत.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे