अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड भागात 'धुरंधर २' हा चित्रपट पाहून आलेल्या नशेखोर तरुणांच्या एका टोळीने दिवसाढवळ्या धुमाकूळ घालत तिघांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांची कारवाई आणि संताप
घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, खदान पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. नांदेडमध्येही 'धुरंधर' चित्रपट पाहून आलेल्या तरुणांनी तिघांची हत्या केल्याची घटना घडली होती, त्याच धर्तीवर अकोल्यातही ही घटना घडल्याने या चित्रपटाचा तरुणांवर होणारा परिणाम चिंतेचा विषय ठरत आहे.






