मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील रेल्वे उड्डाणपुलाचे 'आरओबी'चे पॅनेल्स काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप धीम्या मार्गावर आणि अप व डाऊन जलद मार्गांवर दोन आणि तीन एप्रिल दरम्यानच्या मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांनी ब्लॉक सुरू होईल आणि शुक्रवार ३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.


ब्लॉक काळात ११०२० भुवनेश्वर न्यू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेसचा मार्ग माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान वळवण्यात येईल आणि तिला दादर स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल. तसेच ११०२० भुवनेश्वर न्यू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस, १२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल आणि १२१३४ मंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांना माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान वळवण्यात येईल आणि त्यांना दादर स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल.


पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षितता यासाठी आवश्यक असल्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल

Mumbai : आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम