वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


या बैठकीस माजी आमदार किरण पावसकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


बैठकीत मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या ३० ऑक्टोबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार तसेच ०९ मार्च २०२३ च्या शासन निर्णयात प्रस्तावित करण्यात आलेल्या सुधारणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यात आला.


यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, वर्सोवा कोस्टल रोड व भविष्यातील वाढवण पर्यंत होणारा कोस्टल रोड प्रकल्प एमएमआरडीए च्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील बाधित होणाऱ्या मच्छिमारांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

Amruta Fadnavis: इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार

 कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मुंबई : पंतप्रधान

ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप प्ले-स्टोअरवरून हटवा

परिवहन विभागाचे महाराष्ट्र सायबर विभागाला आदेश; बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर आतापर्यंतची सर्वात मोठी

शहरांमधील बांधकाम आणि पाडकामाच्या ढिगाऱ्यांवर आता सरकारचा 'वॉच'!

 राज्यस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन; नियम मोडणाऱ्या विकासकांवर फौजदारी कारवाई मुंबई : इमारतींच्या

Vasai Shocker : पैशांच्या वादातून विवाहित प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या; मृतदेह निळ्या ड्रममध्ये कोंबला अन्...वसई हादरली!

वसई : पैशांच्या हव्यासापोटी प्रेमाचा किती भयंकर शेवट होऊ शकतो, याचा थरकाप उडवणारा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. एका

Monsoon Update : केरळमध्ये ५ दिवस आधीच मान्सूनची एन्ट्री; मुंबई-कोकणात मे महिन्याच्या अखेर पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी

Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?

घरयादी व घरगणना मोहिमेला शनिवार पासून प्रारंभ, सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन मुंबई