पश्चिम आशियातील युद्धामुळे प्रीमियम पेट्रोल आणि औद्योगिक डिझेल महागले

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे प्रीमियम पेट्रोल तसेच औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. युद्धाचा भडका उडाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी २० मार्चपासून भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात २.३५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.


प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे औद्योगिक डिझेलही महाग झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने औद्योगिक डिझेलच्या दरात लक्षणीय सुधारणा केली आहे. तो प्रति लिटर ८७.६७ रुपयांवरून १०९.५९ रुपयांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयाचा औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. औद्योगिक डिझेल सामान्य पेट्रोल पंपांवर विकले जात नाही. ते थेट कारखाने, मोठे जनरेटर, खाण कंपन्या, बांधकाम स्थळे आणि वीज प्रकल्पांकडून खरेदी केले जाते. यापूर्वी, तेल कंपन्यांनी ब्रँडेड आणि हाय-ऑक्टेन प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर अंदाजे २ रुपयांनी वाढ केली होती. मात्र, सामान्य पेट्रोलचा दर मात्र स्थिर राहिल्याने ग्राहकांना तात्काळ दिलासा मिळाला आहे.


सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नियमित पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विश्लेषकांच्या मते, इंधनाच्या किमतीतील अशा वाढीचा सर्वसामान्य ग्राहकांवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. जेव्हा औद्योगिक उत्पादन आणि मालवाहतुकीचा खर्च वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम अखेरीस वस्तू आणि सेवांच्या किमतींवर होतो, ज्यामुळे महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता असते.


भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग आयात करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांचा देशांतर्गत इंधन दरांवर थेट परिणाम होतो. सध्या, पेट्रोल आणि डिझेलच्या स्थिर किमतींमुळे सर्वसामान्य वाहनचालकांना काहीसा तात्काळ दिलासा मिळाला आहे, परंतु ऊर्जा बाजारातील अनिश्चितता पाहता, आणखी बदलांची शक्यता नाकारता येत नाही.


अन्नाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती : पश्चिम आशियातील रणधुमाळीमुळे केवळ कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत असे नाही, तर याचे पडसाद आता जागतिक अन्नसुरक्षेवर उमटू लागले आहेत. ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या धक्कादायक अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत कोट्यवधी लोकांना अन्नासाठी संघर्ष करावा लागू शकतो. इंधन महागल्याने शेतीचा खर्च वाढून महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तेलासह इतर अनेक जीवनावश्यक वस्तू व सेवांवर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेलाचे भाव वाढल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यापर्यंत जगातील ४ कोटी ५० लाख लोकांना अन्न मिळवण्याची समस्या भेडसावणार आहे. पश्चिम आशियातील युद्धाने आता अन्नाचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


सोन्या-चांदीच्या दरात घसरण : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचे दर सुमारे १५ हजार रुपयांनी प्रति १० ग्रॅमच्या आसपास, तर २२ कॅरेट सोने १३ हजार ७०० रुपये १३ हजार ८०० प्रति ग्रॅमच्या पातळीवर आले. चांदीमध्येही मोठी घसरण होऊन दर २ लाख ५५ हजार ते २ लाख ६५ हजार प्रति किलोपर्यंत खाली आले, ज्यामुळे नवरात्रीच्या काळात खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.


झोमॅटोची डिलिव्हरी महागली : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता थेट भारतीय ग्राहकांच्या खिशाला बसू लागले आहेत. एकीकडे तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करून वाहनधारकांना धक्का दिला असतानाच, दुसरीकडे ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'झोमॅटो'ने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. यामुळे आता घरबसल्या जेवण मागवणे सर्वसामान्यांसाठी अधिक महाग झाले असून, जीवनावश्यक वस्तूंपाठोपाठ सेवा क्षेत्रातील महागाईनेही डोके वर काढले आहे. झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये प्रति ऑर्डर २.४० रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर १४.९० रुपये प्लॅटफॉर्म फी द्यावी लागेल. ‘स्विगी’ आधीपासूनच करासह १४.९९ रुपये प्लॅटफॉर्म फी आकारत आहे. झोमॅटोच्या या निर्णयामुळे आता दोन्ही प्रमुख कंपन्यांचे चार्जेस जवळपास समान झाले आहेत. टक्केवारीच्या हिशोबात पाहिल्यास, झोमॅटोने आपल्या शुल्कात सुमारे १९.२ टक्क्यांची मोठी वाढ केली आहे.

Comments
Add Comment

विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य

मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६

मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर

प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

खरातच्या 'पाद्यपूजे'चे व्हिडीओ Viral, चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश

मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव

राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचा रुपाली चाकणकरांना आदेश

मुंबई : बलात्कार, महिलांचे लैंगिक शोषण, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांमध्ये भोंदू बाबा आणि स्वयंघोषीत कॅप्टन