विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने तेथून जाणाऱ्या काही दुचाकी घसरून पडण्याच्या घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्या. या घटनेमध्ये दुचाकीस्वारांना किरकोळ इजा झाली असून. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे या एका सोहळ्यासाठी विक्रोळी येथून पवईकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली.



पुलावरील तेल गळतीच्या घटनेमुळे संभाव्य मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेता, महापौर रितू तावडे यांनी ताबडतोब वाहनांचा ताफा थांबवून या दुचाकीस्वारांची विचारपूस केली. तसेच वाहतूक पोलिसांना तत्काळ पाचारण करून त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वाहतूक सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित दुचाकीस्वारांना आवश्यक ते प्रथमोपचार त्वरीत करण्यासाठीच्याही सूचना केल्या.


त्याचप्रमाणे, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग कार्यालय, अग्निशमन दल आणि पूल विभाग यांच्याशी महापौरांनी संपर्क साधला. सर्व संबंधित खात्यांनी आपसात समन्वय साधून, पुलावरून वाहतूक निर्धोक व्हावी, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. यांनतर या पुलावरील निसरडा झालेला भाग कोरडा करून स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना